शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मोदींच्या 'मित्रो' शब्दाची राहुल गांधी यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:24 IST

तुम्हाला मित्रो म्हणून संबोधतात मात्र अनिल अंबानी, मेहूल चौकसी यांना ते भाई म्हणून बोलतात. कारण मित्रांकडून पैसे लुबाडायचे आणि भावांना द्यायचे हे मोदींचे काम आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे

करनाल - तुम्ही कधी मोदींचे भाषण ऐकलंय का? लोकांशी बोलताना भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी  नेहमी मित्रो असा उल्लेख करतात, ते तुम्हाला मित्रो म्हणून संबोधतात मात्र अनिल अंबानी, मेहूल चौकसी यांना ते भाई म्हणून बोलतात. कारण मित्रांकडून पैसे लुबाडायचे आणि भावांना द्यायचे हे मोदींचे काम आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ हरयाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांतर्गत राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसने आणलेली न्याय योजना ही गरिबीवर सर्जिकल स्ट्राइक करेल. या योजनेमुळे गरिबी कमी होईल. मागील वेळी आम्ही 14 करोड गरिबांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढले यावेळी 25 करोड लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा आमचा मानस आहे असं राहुल गांधी यांनी सांगितले. 

आम्ही लोकांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांसारखे 15 लाख रुपयांची खोटी आश्वासने दिली नाहीत. मी खोटं कधी बोलत नाही, कारण खोटं बोलण्याचं काम नरेंद्र मोदी करत असतात. आमचं सरकार केंद्रात आल्यानंतर देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही राहुल गांधी यांनी सभेत दिली. 

या देशात प्रामाणिक उद्योजक देखील आहेत. ज्यांना देशासाठी काम करायचं आहे. मात्र अनिल अंबानी यांनी विमान बनविण्याचा कोणताही अनुभव नसतानाही राफेलचं कंत्राट त्यांना देण्यात आलं. मोदी यांनी अनेक आश्वासने दिली त्यातील एकही आश्वासन ते पूर्ण करु शकले नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीkarnal-pcकर्णलHaryanaहरयाणा