शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:43 IST

काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

रायबरेली - २०१४ मध्ये बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला नोटबंदीचा निर्णय चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून नोटबंदीच्या मुद्दावर सत्ताधाऱ्यांवर सतत धारेवर धरले जात आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघात आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल यांनी 'चौकीदार चोर है'चा नारा देखील दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत मागील सत्तर वर्षात काहीच झालं नाही, हे सांगत असतात. यावेळी मात्र राहुल गांधी यांनी ७० वर्षांचा मुद्दा घेत मोदींवर टीका केली. मागील ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने नोटबंदी सारखा मुर्खपणाचा निर्णय घेतला नसल्याचे राहुल यांनी म्हटले. तसेच काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

देशातील एकही तरुण तुम्हाला म्हणणार नाही, की मोदींनी मला नोकरी दिली. त्याचे कारण म्हणजे देशातील बेरोजगारीने मागील ४५ वर्षांतील उच्चांकी गाठली आहे. ७० वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कुणीही केला नाही. नरेंद्र मोदींनी गरीबांचा पैसा हिसकावला. वाजपेयी यांनी देखील अशा पद्धतीने देश चालवाल नाही, असंही राहुल म्हणाले.

दरम्यान देशात सध्या २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. मात्र ही पदे भरण्याची इच्छा शक्ती मोदींमध्ये नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस ही पदे भरणार आहे. एका वर्षात ही कामगिरी करून दाखवू असं वचन राहुल यांनी येथील जनतेला दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी