शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:43 IST

काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

रायबरेली - २०१४ मध्ये बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला नोटबंदीचा निर्णय चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून नोटबंदीच्या मुद्दावर सत्ताधाऱ्यांवर सतत धारेवर धरले जात आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघात आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल यांनी 'चौकीदार चोर है'चा नारा देखील दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत मागील सत्तर वर्षात काहीच झालं नाही, हे सांगत असतात. यावेळी मात्र राहुल गांधी यांनी ७० वर्षांचा मुद्दा घेत मोदींवर टीका केली. मागील ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने नोटबंदी सारखा मुर्खपणाचा निर्णय घेतला नसल्याचे राहुल यांनी म्हटले. तसेच काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

देशातील एकही तरुण तुम्हाला म्हणणार नाही, की मोदींनी मला नोकरी दिली. त्याचे कारण म्हणजे देशातील बेरोजगारीने मागील ४५ वर्षांतील उच्चांकी गाठली आहे. ७० वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कुणीही केला नाही. नरेंद्र मोदींनी गरीबांचा पैसा हिसकावला. वाजपेयी यांनी देखील अशा पद्धतीने देश चालवाल नाही, असंही राहुल म्हणाले.

दरम्यान देशात सध्या २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. मात्र ही पदे भरण्याची इच्छा शक्ती मोदींमध्ये नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस ही पदे भरणार आहे. एका वर्षात ही कामगिरी करून दाखवू असं वचन राहुल यांनी येथील जनतेला दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी