शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
2
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
3
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
6
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
7
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
8
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
9
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
10
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
11
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
12
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
13
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
14
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
15
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
16
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
17
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
19
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
20
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी

लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 18:00 IST

भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीच्या एक्झिट पोलमध्ये केंद्रातील भाजपप्रणीत एनडीएला बहुमत दाखविण्यात आले आहे. असं असले तरी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रातील सत्तेसाठी सर्वांच्या हालचाली असताना मध्य प्रदेशात मात्र चित्र वेगळ असून येथे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती किंगमेकर म्हणून समोर येत आहेत.

मध्य प्रदेशात विरोधात असलेल्या भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभेचे सत्र बोलविण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाला ज्या प्रमाणे देशात आणि राज्यात पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये सामील होण्यास इच्छूक आहेत. भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे.

२०१८ मध्ये झालेल्या २३० विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. केवळ दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेस बहुमतापासून दूर आहे. तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्तेसाठी ७ जागांची आवश्यकता होती. या निवडणुकीत बसपाचे दोन, सपाचा एक आणि चार अपक्ष आमदार निवडून आले होते. सपा-बसपाने आधीच काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अपक्ष आमदारांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र मध्य प्रदेशात अपक्षांच्या पाठिंब्या व्यतिरिक्त बसपाचा पाठिंबा काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे.

दरम्यान भाजपकडे मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे, बसपा-सपा यांच्यासह चार अपक्षांचा भाजपला पाठिंबा मिळवणे आणि दुसरा म्हणजे काँग्रेसच्या काही आमदारांना आपल्या सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणे. अशा स्थितीत मायावती काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मायावती यांच्या दोन आमदारांच्या मदतीने काँग्रेसची सत्ता कायम राहणार आहे.

मायावतींचा नकार

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत दाखविण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक बोलविली होती. त्या बैठकीला मायावती यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र मायावती यांनी बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेससाठी लोकसभेसह मध्य प्रदेशातील पेच आणखीनच जटील होण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९mayawatiमायावतीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश