शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:35 IST

मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत.

रायबरेली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागलेत. उत्तर प्रदेश येथून लोकसभेमध्ये सर्वाधिक खासदार निवडून येतात. मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत. 

उत्तर प्रदेशातील या जागांमध्ये महत्त्वाची जागा ती म्हणजे काँग्रेसचा गड असलेली रायबरेली लोकसभा मतदारसंघ. या जागेवरुन माजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून येत असतात. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे अजून जाहीर केलं नाही मात्र भाजपाकडून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी अनेक नावं पुढे येत आहे. त्यामध्ये मागील भाजपा उमेदवार अजय अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे. 

रायबरेली लोकसभा मतदारसंघाशी गांधी-नेहरू घराण्याचे जुनं नातं आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोतीलाल नेहरू आणि 1921 मध्ये मुशींगंज येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर जवाहरलाल नेहरू याठिकाणी आले. आत्तापर्यंत तीन अपवाद वगळता रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्यात यश आलं नाही. 1977 मध्ये जनता पार्टीकडून राज नारायण, 1996 आणि 1998 मध्ये भाजपाचे अशोक कुमार सिंह यांनी रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर या मतदारसंघावर नेहरु-गांधी कुटुंबाचा वचक आहे. तीन अपवाद वगळता कायम हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.  2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघात विजय मिळवला होता. 

1967 ते 1977 या कालावधीत रायबरेलीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. अनेक मोठ्या कंपन्या, संस्था याठिकाणी आल्या. मात्र 1977 नंतर जनता पार्टीचे राजनारायण याठिकाणी खासदार झाले तेव्हापासून रायबरेलीच्या विकासाला खीळ बसली असं येथील स्थानिक लोकांचे म्हणणं आहे. रायबरेली मतदारसंघात 16 लाख 50 हजार 767 मतदार आहेत. यामध्ये 8 लाख 70 हजार 954 पुरुष मतदार आहेत तर 7 लाख 79 हजार 813 महिला मतदार आहेत. 

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून अजय अग्रवाल या ठिकाणी निवडणूक लढण्यात इच्छुक आहेत. अग्रवाल यांच्याशिवाय काँग्रेसचे बंडखोर दिनेश प्रताप सिंह  भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अजय अग्रवाल, दिनेश प्रताप सिंह यांच्यासह अमर सिंह, कुमार विश्वास आणि मिनाक्षी लेखी यांच्या नावाचीही भाजपाकडून चर्चा आहे. मात्र अद्याप भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणताही निर्णय घेतला नाही.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक