शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

रायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:35 IST

मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत.

रायबरेली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागलेत. उत्तर प्रदेश येथून लोकसभेमध्ये सर्वाधिक खासदार निवडून येतात. मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत. 

उत्तर प्रदेशातील या जागांमध्ये महत्त्वाची जागा ती म्हणजे काँग्रेसचा गड असलेली रायबरेली लोकसभा मतदारसंघ. या जागेवरुन माजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून येत असतात. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे अजून जाहीर केलं नाही मात्र भाजपाकडून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी अनेक नावं पुढे येत आहे. त्यामध्ये मागील भाजपा उमेदवार अजय अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे. 

रायबरेली लोकसभा मतदारसंघाशी गांधी-नेहरू घराण्याचे जुनं नातं आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोतीलाल नेहरू आणि 1921 मध्ये मुशींगंज येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर जवाहरलाल नेहरू याठिकाणी आले. आत्तापर्यंत तीन अपवाद वगळता रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्यात यश आलं नाही. 1977 मध्ये जनता पार्टीकडून राज नारायण, 1996 आणि 1998 मध्ये भाजपाचे अशोक कुमार सिंह यांनी रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर या मतदारसंघावर नेहरु-गांधी कुटुंबाचा वचक आहे. तीन अपवाद वगळता कायम हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.  2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघात विजय मिळवला होता. 

1967 ते 1977 या कालावधीत रायबरेलीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. अनेक मोठ्या कंपन्या, संस्था याठिकाणी आल्या. मात्र 1977 नंतर जनता पार्टीचे राजनारायण याठिकाणी खासदार झाले तेव्हापासून रायबरेलीच्या विकासाला खीळ बसली असं येथील स्थानिक लोकांचे म्हणणं आहे. रायबरेली मतदारसंघात 16 लाख 50 हजार 767 मतदार आहेत. यामध्ये 8 लाख 70 हजार 954 पुरुष मतदार आहेत तर 7 लाख 79 हजार 813 महिला मतदार आहेत. 

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून अजय अग्रवाल या ठिकाणी निवडणूक लढण्यात इच्छुक आहेत. अग्रवाल यांच्याशिवाय काँग्रेसचे बंडखोर दिनेश प्रताप सिंह  भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अजय अग्रवाल, दिनेश प्रताप सिंह यांच्यासह अमर सिंह, कुमार विश्वास आणि मिनाक्षी लेखी यांच्या नावाचीही भाजपाकडून चर्चा आहे. मात्र अद्याप भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणताही निर्णय घेतला नाही.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक