शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

...तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता - भाजप नेत्याचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:47 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते संगीत सोम यांनी एअर स्ट्राइकवर भाष्य करताना हवाई दल अजून काही काळ बालकोटमध्ये थांबले असते तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता असं वक्तव्य केले आहे. 

उत्तर प्रदेश येथील शामली जिल्ह्यातील प्रचार रॅलीला संबोधित करताना संगीत सोम म्हणाले की, बालकोट परिसरात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यासाठी आपले हवाई दल त्याठिकाणी पोहचलं. बालकोट भागापासून काही अंतरावरच लाहोर शहर आहे. लाहोर इतकं जवळ आहे की, अजून दोन मिनिटे आपलं हवाई दल त्याठिकाणी थांबले असतं तर लाहोरमध्ये तिरंगा फडकलेला दिसला असता.

संगीत सोम हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील सरधाना या मतदारसंघाचे आमदार आहे. सोम आपल्या विधानांनी वारंवार चर्चेत असतात. संगीत सोम यांचे हे विधान आता सोशल मिडीयात व्हायरल होतं आहे. संगीत सोम यांचं नाव 2013 मध्ये मुजफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपपत्रात होतं. सोम यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर निवडणुकीचं वातावरण बदल्याचं चित्र पाहायला मिळालं. एअर स्ट्राइकसारख्या धाडसी निर्णयामुळे देशभरातून नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात येत होतं. भारतीय जनता पार्टीकडून एअर स्ट्राइकचा मुद्दा देशभक्तीचा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलं, घरात घुसून मारले, हा नवीन भारत आहे असा उल्लेख कायम करण्यात येतो. भाजपच्या मंत्र्यांच्या भाषणातही एअर स्ट्राइकचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो.  

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारत