शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

...तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता - भाजप नेत्याचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:47 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते संगीत सोम यांनी एअर स्ट्राइकवर भाष्य करताना हवाई दल अजून काही काळ बालकोटमध्ये थांबले असते तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता असं वक्तव्य केले आहे. 

उत्तर प्रदेश येथील शामली जिल्ह्यातील प्रचार रॅलीला संबोधित करताना संगीत सोम म्हणाले की, बालकोट परिसरात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यासाठी आपले हवाई दल त्याठिकाणी पोहचलं. बालकोट भागापासून काही अंतरावरच लाहोर शहर आहे. लाहोर इतकं जवळ आहे की, अजून दोन मिनिटे आपलं हवाई दल त्याठिकाणी थांबले असतं तर लाहोरमध्ये तिरंगा फडकलेला दिसला असता.

संगीत सोम हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील सरधाना या मतदारसंघाचे आमदार आहे. सोम आपल्या विधानांनी वारंवार चर्चेत असतात. संगीत सोम यांचे हे विधान आता सोशल मिडीयात व्हायरल होतं आहे. संगीत सोम यांचं नाव 2013 मध्ये मुजफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपपत्रात होतं. सोम यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर निवडणुकीचं वातावरण बदल्याचं चित्र पाहायला मिळालं. एअर स्ट्राइकसारख्या धाडसी निर्णयामुळे देशभरातून नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात येत होतं. भारतीय जनता पार्टीकडून एअर स्ट्राइकचा मुद्दा देशभक्तीचा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलं, घरात घुसून मारले, हा नवीन भारत आहे असा उल्लेख कायम करण्यात येतो. भाजपच्या मंत्र्यांच्या भाषणातही एअर स्ट्राइकचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो.  

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारत