शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता - भाजप नेत्याचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:47 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते संगीत सोम यांनी एअर स्ट्राइकवर भाष्य करताना हवाई दल अजून काही काळ बालकोटमध्ये थांबले असते तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता असं वक्तव्य केले आहे. 

उत्तर प्रदेश येथील शामली जिल्ह्यातील प्रचार रॅलीला संबोधित करताना संगीत सोम म्हणाले की, बालकोट परिसरात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यासाठी आपले हवाई दल त्याठिकाणी पोहचलं. बालकोट भागापासून काही अंतरावरच लाहोर शहर आहे. लाहोर इतकं जवळ आहे की, अजून दोन मिनिटे आपलं हवाई दल त्याठिकाणी थांबले असतं तर लाहोरमध्ये तिरंगा फडकलेला दिसला असता.

संगीत सोम हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील सरधाना या मतदारसंघाचे आमदार आहे. सोम आपल्या विधानांनी वारंवार चर्चेत असतात. संगीत सोम यांचे हे विधान आता सोशल मिडीयात व्हायरल होतं आहे. संगीत सोम यांचं नाव 2013 मध्ये मुजफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपपत्रात होतं. सोम यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर निवडणुकीचं वातावरण बदल्याचं चित्र पाहायला मिळालं. एअर स्ट्राइकसारख्या धाडसी निर्णयामुळे देशभरातून नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात येत होतं. भारतीय जनता पार्टीकडून एअर स्ट्राइकचा मुद्दा देशभक्तीचा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलं, घरात घुसून मारले, हा नवीन भारत आहे असा उल्लेख कायम करण्यात येतो. भाजपच्या मंत्र्यांच्या भाषणातही एअर स्ट्राइकचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो.  

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारत