शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

६८ वर्षांत एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची पाचवी निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 07:01 IST

२००४ पासून एप्रिल महिन्यालाच पसंती; आयोगाची अवघड परीक्षा

- धनंजय वाखारे नाशिक : लोकसभेसाठी ६८ वर्षांत एप्रिल महिन्यात होणारी ही पाचवी निवडणूक आहे. २००४ पासून भारतीय निवडणूक आयोगाकडून एप्रिल आणि मे महिन्यातच निवडणुका घेतल्या जात आहेत.पहिली लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात आली होती. ऑक्टोबर १९५१, डिसेंबर १९५१ आणि फेब्रुवारी १९५२ मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाचा गाडा सुरळीत झाला. १९५७ मध्ये २४ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. १९६२ मध्ये १९ ते २५ फेबु्रवारी, १९६७ मध्ये १७ ते २१ फेबु्रवारी, १९७१ मध्ये १ ते १० मार्च, १९७७ मध्ये १६ ते २० मार्च, १९८० मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर ३ ते ६ जानेवारी तर पुढे चार वर्षांतच १९८४ मध्ये २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत निवडणूक झाली होती.१९८९ मध्ये २२ ते २६ नोव्हेंबर, १९९१ मध्ये २० मे ते १५ जून तर नरसिंहराव सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर १९९६ मध्ये २७ एप्रिल आणि २ ते ३० मे अशा कालावधीत निवडणुका झाल्या. दोन वर्षातच सरकार कोसळल्यानंतर १९९८ मध्ये १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान निवडणूक झाली. पुढे एका वर्षातच १९९९ मध्ये ५, ११, १८, २५ सप्टेंबर आणि ३ ते ६ ऑक्टोबर या अशा विविध टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. १९९९ नंतर सरकार पूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यात यशस्वी होत गेले. त्यामुळे २००४ मध्ये २० एप्रिल ते १० मे, २००९ मध्ये १६ एप्रिल ते १३ मे कालावधीत निवडणूक झाली. २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे असा महिनाभराचा कालावधी होता.चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया१९८० मध्ये चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा विक्रम भारतीय निवडणूक आयोगाने केला होता. ३ ते ६ जानेवारी या अवघ्या चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. त्यानंतर, १९६७, १९७७, १९८४ आणि १९८९ या वर्षी पाच दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद आहे. १९९१ च्या निवडणुकीपासून मात्र वेगवेगळ्या टप्प्यांत दीर्घ कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झालेली आहे.कोणत्या राज्यात कोणकोणत्या टप्प्यात होणार मतदानपहिला टप्पा : ११ एप्रिल : ९१ जागा - आंध्र प्रदेश २५ जागा, अरुणाचल २ जागा, आसम ५ जागा, बिहार ४ जागा, छत्तीसगढ १ जागा, जम्मू-काश्मीर २ जाग), महाराष्ट्र ७ जागा, मेघालय १ जागा, मिजोरम १ जागा, ओडिशा ४ जागा, सिक्किम १ जागा, तेलंगाना १७ जागा, त्रिपुरा १ जागा, उत्तर प्रदेश ८ जागा, उत्तराखंड ५ जागा, पश्चिम बंगाल २ जागा, अंदमान निकोबार १ जागा, लक्षद्वीप १ जागा.दुसरा टप्पा : १८ एप्रिल : ९१ जागा - आसम ५, बिहार ५, छत्तीसगढ ५, जम्मू-काश्मीर-२, कर्नाटक १४, महाराष्ट्र १०, मणिपूर १, ओडिशा ५, तमिळनाडू ३९, त्रिपुरा १, उत्तर प्रदेश ८, पश्चिम बंगाल ३, पुद्दुचेरी १.तिसरा टप्पा : २३ एप्रिल : ११५ जागा - आसम ४, बिहार ५, छत्तीसगढ ७, गुजरात २६, गोवा २, जम्मू-काश्मीर १, कर्नाटक १४, केरळ २०, महाराष्ट्र १४, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १०, प. बंगाल ५, दादर नागर हवेली १, दमन दीव १.चौथा टप्पा : २९ एप्रिल : ७१ जागा - बिहार ५, जम्मू-काश्मीर १, झारखंड ३, मध्यप्रदेश ६, महाराष्ट्र १७, ओडिशा ६, राजस्थान १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ८पाचवा टप्पा : ६ मे : ५१ जागा - बिहार ५, जम्मू काश्मीर २, झारखंड ४, मध्यप्रदेश ७, राजस्थान १२, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ७सहावा टप्पा : १२ मे : ५९ जागा - बिहार ८, हरियाणा १०, झारखंड ४, मध्यप्रदेश ८, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ८, दिल्ली ७सातवा टप्पा : १९ मे : ५९ जागा - बिहार ८, झारखंड ३, मध्यप्रदेश ८, पंजाब १३, चंडीगढ़ १, पश्चिम बंगाल ९, हिमाचल ४आजपर्यंतच्या सर्व लोकसभानिवडणुकांच्या तारखा सरकार कोणाचे पंतप्रधान१) १९५१-५२ - ऑक्टोबर १९५१, - काँग्रेस - पं.जवाहरलाल नेहरूडिसेंबर १९५१, फेब्रुवारी १९५२.२) १९५७ - २४ फेब्रुवारी ते १४ मार्च- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू३) १९६२ - १९ ते २५ फेब्रुवारी- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू४) १९६७ - १७ ते २१ फेब्रुवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी५) १९७१ - १ ते १० मार्च- काँग्रेस- इंदिरा गांधी६) १९७७ - १६ ते २० मार्च- जनता- पक्ष मोरारजी देसाई७) १९८० - ३ ते ६ जानेवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी८) १९८४ - २४ ते २८ डिसेंबर- काँग्रेस- राजीव गांधी९) १९८९ - २२ ते २६ नोव्हेंबर- जनता दल- व्ही.पी.सिंग१०) १९९१ - २० मे ते १५ जून- काँग्रेस- नरसिंह राव११) १९९६ - २७ एप्रिल ते ३० मे - भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१२) १९९८ - १६ ते २३ फेब्रुवारी- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१३) १९९९ - ५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१४) २००४ - २० एप्रिल ते १० मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग१५) २००९ - १६ एप्रिल ते १३ मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग१६) २०१४ - ७ एप्रिल ते १२ मे- भाजपाप्रणित एनडीए- नरेंद्र मोदी१७) २०१९ - ११ एप्रिल ते १९ मे ? ?(टीप : पं.जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आधी गुलजारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधान झाले. त्यानंतर लालबहादूर शास्री पंतप्रधान झाले.शास्रींच्या निधनानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील जनता सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चौधरी चरणसिंह पंतप्रधान झाले. १९९१ मध्ये व्ही.पी.सिंग सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर पंतप्रधान झाले. १९९६ मध्ये वाजपेयी सरकार तेराच दिवस टिकले आणि आधी एच.डी.देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने पंतप्रधान झाले पण त्यांचे सरकारही अल्पजीवी ठरले.)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपा