शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

६८ वर्षांत एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची पाचवी निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 07:01 IST

२००४ पासून एप्रिल महिन्यालाच पसंती; आयोगाची अवघड परीक्षा

- धनंजय वाखारे नाशिक : लोकसभेसाठी ६८ वर्षांत एप्रिल महिन्यात होणारी ही पाचवी निवडणूक आहे. २००४ पासून भारतीय निवडणूक आयोगाकडून एप्रिल आणि मे महिन्यातच निवडणुका घेतल्या जात आहेत.पहिली लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात आली होती. ऑक्टोबर १९५१, डिसेंबर १९५१ आणि फेब्रुवारी १९५२ मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाचा गाडा सुरळीत झाला. १९५७ मध्ये २४ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. १९६२ मध्ये १९ ते २५ फेबु्रवारी, १९६७ मध्ये १७ ते २१ फेबु्रवारी, १९७१ मध्ये १ ते १० मार्च, १९७७ मध्ये १६ ते २० मार्च, १९८० मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर ३ ते ६ जानेवारी तर पुढे चार वर्षांतच १९८४ मध्ये २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत निवडणूक झाली होती.१९८९ मध्ये २२ ते २६ नोव्हेंबर, १९९१ मध्ये २० मे ते १५ जून तर नरसिंहराव सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर १९९६ मध्ये २७ एप्रिल आणि २ ते ३० मे अशा कालावधीत निवडणुका झाल्या. दोन वर्षातच सरकार कोसळल्यानंतर १९९८ मध्ये १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान निवडणूक झाली. पुढे एका वर्षातच १९९९ मध्ये ५, ११, १८, २५ सप्टेंबर आणि ३ ते ६ ऑक्टोबर या अशा विविध टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. १९९९ नंतर सरकार पूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यात यशस्वी होत गेले. त्यामुळे २००४ मध्ये २० एप्रिल ते १० मे, २००९ मध्ये १६ एप्रिल ते १३ मे कालावधीत निवडणूक झाली. २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे असा महिनाभराचा कालावधी होता.चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया१९८० मध्ये चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा विक्रम भारतीय निवडणूक आयोगाने केला होता. ३ ते ६ जानेवारी या अवघ्या चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. त्यानंतर, १९६७, १९७७, १९८४ आणि १९८९ या वर्षी पाच दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद आहे. १९९१ च्या निवडणुकीपासून मात्र वेगवेगळ्या टप्प्यांत दीर्घ कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झालेली आहे.कोणत्या राज्यात कोणकोणत्या टप्प्यात होणार मतदानपहिला टप्पा : ११ एप्रिल : ९१ जागा - आंध्र प्रदेश २५ जागा, अरुणाचल २ जागा, आसम ५ जागा, बिहार ४ जागा, छत्तीसगढ १ जागा, जम्मू-काश्मीर २ जाग), महाराष्ट्र ७ जागा, मेघालय १ जागा, मिजोरम १ जागा, ओडिशा ४ जागा, सिक्किम १ जागा, तेलंगाना १७ जागा, त्रिपुरा १ जागा, उत्तर प्रदेश ८ जागा, उत्तराखंड ५ जागा, पश्चिम बंगाल २ जागा, अंदमान निकोबार १ जागा, लक्षद्वीप १ जागा.दुसरा टप्पा : १८ एप्रिल : ९१ जागा - आसम ५, बिहार ५, छत्तीसगढ ५, जम्मू-काश्मीर-२, कर्नाटक १४, महाराष्ट्र १०, मणिपूर १, ओडिशा ५, तमिळनाडू ३९, त्रिपुरा १, उत्तर प्रदेश ८, पश्चिम बंगाल ३, पुद्दुचेरी १.तिसरा टप्पा : २३ एप्रिल : ११५ जागा - आसम ४, बिहार ५, छत्तीसगढ ७, गुजरात २६, गोवा २, जम्मू-काश्मीर १, कर्नाटक १४, केरळ २०, महाराष्ट्र १४, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १०, प. बंगाल ५, दादर नागर हवेली १, दमन दीव १.चौथा टप्पा : २९ एप्रिल : ७१ जागा - बिहार ५, जम्मू-काश्मीर १, झारखंड ३, मध्यप्रदेश ६, महाराष्ट्र १७, ओडिशा ६, राजस्थान १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ८पाचवा टप्पा : ६ मे : ५१ जागा - बिहार ५, जम्मू काश्मीर २, झारखंड ४, मध्यप्रदेश ७, राजस्थान १२, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ७सहावा टप्पा : १२ मे : ५९ जागा - बिहार ८, हरियाणा १०, झारखंड ४, मध्यप्रदेश ८, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ८, दिल्ली ७सातवा टप्पा : १९ मे : ५९ जागा - बिहार ८, झारखंड ३, मध्यप्रदेश ८, पंजाब १३, चंडीगढ़ १, पश्चिम बंगाल ९, हिमाचल ४आजपर्यंतच्या सर्व लोकसभानिवडणुकांच्या तारखा सरकार कोणाचे पंतप्रधान१) १९५१-५२ - ऑक्टोबर १९५१, - काँग्रेस - पं.जवाहरलाल नेहरूडिसेंबर १९५१, फेब्रुवारी १९५२.२) १९५७ - २४ फेब्रुवारी ते १४ मार्च- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू३) १९६२ - १९ ते २५ फेब्रुवारी- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू४) १९६७ - १७ ते २१ फेब्रुवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी५) १९७१ - १ ते १० मार्च- काँग्रेस- इंदिरा गांधी६) १९७७ - १६ ते २० मार्च- जनता- पक्ष मोरारजी देसाई७) १९८० - ३ ते ६ जानेवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी८) १९८४ - २४ ते २८ डिसेंबर- काँग्रेस- राजीव गांधी९) १९८९ - २२ ते २६ नोव्हेंबर- जनता दल- व्ही.पी.सिंग१०) १९९१ - २० मे ते १५ जून- काँग्रेस- नरसिंह राव११) १९९६ - २७ एप्रिल ते ३० मे - भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१२) १९९८ - १६ ते २३ फेब्रुवारी- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१३) १९९९ - ५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१४) २००४ - २० एप्रिल ते १० मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग१५) २००९ - १६ एप्रिल ते १३ मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग१६) २०१४ - ७ एप्रिल ते १२ मे- भाजपाप्रणित एनडीए- नरेंद्र मोदी१७) २०१९ - ११ एप्रिल ते १९ मे ? ?(टीप : पं.जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आधी गुलजारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधान झाले. त्यानंतर लालबहादूर शास्री पंतप्रधान झाले.शास्रींच्या निधनानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील जनता सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चौधरी चरणसिंह पंतप्रधान झाले. १९९१ मध्ये व्ही.पी.सिंग सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर पंतप्रधान झाले. १९९६ मध्ये वाजपेयी सरकार तेराच दिवस टिकले आणि आधी एच.डी.देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने पंतप्रधान झाले पण त्यांचे सरकारही अल्पजीवी ठरले.)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपा