शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 10:12 IST

Lok Sabha Election Result 2024 Prashant Kishor And BJP : प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून NDA आघाडी २९३ जागांसह केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. हे आकडे एक्झिट पोलचे निकाल आणि निवडणूक विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळे आहेत. यावर इंडिया टुडेने राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली.

प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. तसेच निवडणूक निकालांबाबतचं त्यांचं भाकीतही चुकीचं ठरल्याचं त्यांनी मान्य केलं. यावेळी त्यांनी भाजपाच्या '४०० पार' या नाऱ्याचा देखील उल्लेख केला.

भाजपाच्या जागा कमी होण्यामागील कारणं सांगताना प्रशांत किशोर म्हणाले की, "'४०० पार'चा हा नारा कोणी लिहिला, या नाऱ्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पण हा अपूर्ण नारा आहे. '४०० पार' आहे पण कशासाठी? त्यांनी ते असंच सोडून दिलं. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे  'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' असा नारा दिला होता. कारण मोदी सरकार का हवंय तर महागाई आहे हा उद्देश स्पष्ट होता."

"४०० पार या नाऱ्यामुळे जास्त नुकसान"

"यावेळी तुम्ही ४०० पार असं म्हटलं, समाजाने हे अहंकार म्हणून घेतलं आणि विरोधकांनी हे संविधान बदलतील असं सांगितलं. ज्यांनी कोणी पक्षासाठी हा नारा लिहिला त्यांनी ४०० पार का? हेच सांगितलं नाही. ४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचं सर्वत्र नुकसान झालं आहे."

"खासदारांवर नाराज होते कार्यकर्ते" 

"भाजपाची सर्वात कमकुवत गोष्ट म्हणजे मोदींवर जास्त अवलंबून राहणं. कार्यकर्ता म्हणाला, ४०० जागा येत आहेत, त्यांना (खासदार) धडा शिकवायचा आहे. तुम्ही माझ्या क्षेत्र आरा, आर के सिंह यांचं उदाहरण घेऊ शकता. तुम्ही कोणालाही विचारा लोक म्हणतात की, चांगलं काम केलं, चांगले मंत्री राहिले पण कार्यकर्ते नाराज होते कारण ते त्यांना भाव द्यायचे नाही."

वाराणसीचं दिलं उदाहरण 

"आपण नक्कीच जिंकतोय, असं भाजपा समर्थकांना वाटत होतं. काही उद्देश नव्हता कारण ४०० पार होत होतं. याउलट जे भाजपा आणि मोदींच्या विरोधात होते, त्यांच्याकडे आपण यांना कोणत्याही मार्गाने रोखलेच पाहिजे, असं उद्दिष्ट होतं. मी तुम्हाला वाराणसीचं उदाहरण देतो. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या स्वतःच्या जागेवरील मतांची टक्केवारी केवळ २ टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे मताधिक्य २०.९ वरून ४१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने फरक लक्षणीयरीत्या खाली आला" असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी