शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 10:12 IST

Lok Sabha Election Result 2024 Prashant Kishor And BJP : प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून NDA आघाडी २९३ जागांसह केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. हे आकडे एक्झिट पोलचे निकाल आणि निवडणूक विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळे आहेत. यावर इंडिया टुडेने राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली.

प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. तसेच निवडणूक निकालांबाबतचं त्यांचं भाकीतही चुकीचं ठरल्याचं त्यांनी मान्य केलं. यावेळी त्यांनी भाजपाच्या '४०० पार' या नाऱ्याचा देखील उल्लेख केला.

भाजपाच्या जागा कमी होण्यामागील कारणं सांगताना प्रशांत किशोर म्हणाले की, "'४०० पार'चा हा नारा कोणी लिहिला, या नाऱ्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पण हा अपूर्ण नारा आहे. '४०० पार' आहे पण कशासाठी? त्यांनी ते असंच सोडून दिलं. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे  'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' असा नारा दिला होता. कारण मोदी सरकार का हवंय तर महागाई आहे हा उद्देश स्पष्ट होता."

"४०० पार या नाऱ्यामुळे जास्त नुकसान"

"यावेळी तुम्ही ४०० पार असं म्हटलं, समाजाने हे अहंकार म्हणून घेतलं आणि विरोधकांनी हे संविधान बदलतील असं सांगितलं. ज्यांनी कोणी पक्षासाठी हा नारा लिहिला त्यांनी ४०० पार का? हेच सांगितलं नाही. ४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचं सर्वत्र नुकसान झालं आहे."

"खासदारांवर नाराज होते कार्यकर्ते" 

"भाजपाची सर्वात कमकुवत गोष्ट म्हणजे मोदींवर जास्त अवलंबून राहणं. कार्यकर्ता म्हणाला, ४०० जागा येत आहेत, त्यांना (खासदार) धडा शिकवायचा आहे. तुम्ही माझ्या क्षेत्र आरा, आर के सिंह यांचं उदाहरण घेऊ शकता. तुम्ही कोणालाही विचारा लोक म्हणतात की, चांगलं काम केलं, चांगले मंत्री राहिले पण कार्यकर्ते नाराज होते कारण ते त्यांना भाव द्यायचे नाही."

वाराणसीचं दिलं उदाहरण 

"आपण नक्कीच जिंकतोय, असं भाजपा समर्थकांना वाटत होतं. काही उद्देश नव्हता कारण ४०० पार होत होतं. याउलट जे भाजपा आणि मोदींच्या विरोधात होते, त्यांच्याकडे आपण यांना कोणत्याही मार्गाने रोखलेच पाहिजे, असं उद्दिष्ट होतं. मी तुम्हाला वाराणसीचं उदाहरण देतो. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या स्वतःच्या जागेवरील मतांची टक्केवारी केवळ २ टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे मताधिक्य २०.९ वरून ४१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने फरक लक्षणीयरीत्या खाली आला" असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी