शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

'रेस' सिनेमातील 'तो' डायलॉग अन् देशात उसळलेली मोदी लाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:46 IST

हा डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे.

ठळक मुद्दे'मोदी हटाओ'चा विडाच उचललेल्या विरोधकांना नरेंद्र मोदींनी अक्षरशः झोपवले. 'रेस' सिनेमातील एक डायलॉग मोदींच्या यशाचं गमक सांगून जाणारा वाटतो.

'फिर एक बार... मोदी सरकार', 'अब की बार... तीन सौ पार', असा निर्धार करूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे 'राईट हँड' भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे लाखो कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २०१४ मध्ये जसं वातावरण होतं, तसं यावेळी नव्हतं - किंबहुना ते दिसत नव्हतं असं आता म्हणावं लागेल. त्यामुळे स्वाभाविकच २०१९चा महासंग्राम त्यांच्यासाठी सोपा नव्हता. परंतु, त्यांनी दिलेले दोन्ही नारे खरे 'करून दाखवले' आणि 'मोदी हटाओ'चा विडाच उचललेल्या विरोधकांना अक्षरशः झोपवले. देशात 'मोदी त्सुनामी'च उसळली. या अतिविराट यशामागे काय कारणं आहेत, यावर तज्ज्ञ मंडळी विचारमंथन करत आहेत. एअर स्ट्राईक, हिंदूराष्ट्रवादाचा मुद्दा, प्रचारात विरोधकांना भरकटवण्याची खेळी इथपासून ते सक्षम पर्याय नसण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. ही कारणमीमांसा करताना, 'रेस' सिनेमातील एक डायलॉग मोदींच्या यशाचं गमक सांगून जाणारा वाटतो.

सैफ अली खान आणि अक्षय खन्ना हे दोघं 'रेस' सिनेमात भाऊ असतात. मोठा भाऊ सैफचं यश अक्षयच्या डोळ्यात खुपत असतं, डोक्यात जात असतं. त्यामुळे तो त्याला हरवण्यासाठी बरीच कारस्थानं करत असतो. अक्षयवर जीव ओवाळून टाकणाऱ्या सैफला हे सगळं समजतं आणि मग तो त्याचाच डाव त्याच्यावर उलटवून 'रेस' जिंकतो, अशी सिनेमाची गोष्ट. या सिनेमात सैफचा एक डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे. आश्चर्य म्हणजे, हा डायलॉग लोकसभा निकालांना तंतोतंत लागू पडतो. 

सैफ अली खान अक्षयला म्हणतो,  'तुम कभी जीत नही पाए क्यूं की तुम हमेशा मुझे हराने की सोचते थे, और मैं कभी हारा नहीं, क्यूं की मैं हमेशा जितने की सोचता था'

लोकसभा निवडणुकीच्या 'रेस'मध्येही हेच तर झालं. देशभरातील पाच-दहा नव्हे तर २०-२२ पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी मैदानात उतरले होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जेडीएस, डावे आणि अनेक. प्रत्येक जण प्रत्येक सभेमध्ये, चर्चांमध्ये एकच गोष्ट सांगत होता - मोदींना मत देऊ नका, त्यांना पराभूत करा, सत्तेतून खाली खेचा. महाराष्ट्रात तर, एकही जागा न लढवणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला काय आवाहन केलं होतं आठवा. मोदी आणि शहा या दोघांना राजकीय क्षितिजावरून कायमचं दूर करा, असं त्यांनी म्हटलं होतं. याउलट, नरेंद्र मोदी प्रत्येक प्रचारसभेत जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत होते. पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी, भाजपाच्या विजयासाठी मतांचा जोगवा मागत होते. तो मतदारांनी त्यांना दिल्याचं निकालातून स्पष्ट झालं. पाच वर्षं त्यांनी चालवलेलं सरकार, त्यांची ध्येय-धोरणं, निर्णय, त्यांनी मांडलेले मुद्दे, त्यांनी केलेला प्रचार किती योग्य, किती अयोग्य हा वादाचा विषय; पण जनादेश त्यांनी जिंकला आहे आणि लोकशाहीत त्याहून मोठं काहीच नाही.  

नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचारांमध्ये अधिक सामर्थ्य असतं, हे आपल्याला प्रत्येकालाच ठाऊक आहे. सैफ अली खानचा डायलॉग वेगळ्या शब्दांत तेच सांगतो. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही ते समजत होतं. पण, त्यांची थोडी गल्लत झाली. त्यांनी मोदींची गळाभेट घेणारे, प्रेम करणं ही संस्कृती असल्याचं म्हटलं. पण, 'आम्हाला जिंकवा' असं सांगण्याऐवजी 'त्यांना पाडा' यावरच त्यांचा भर होता. याउलट, जनतेची नस ओळखलेल्या मोदींनी बहुधा विजयाचं सूत्र अचूक हेरलं आणि 'लाटे'चं रूपांतर 'त्सुनामी'त केलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अर्थात, आता इथून पुढेही त्यांना हाच सकारात्मक विचार पुढे न्यावा लागेल, हे नक्की!

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी