शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

'रेस' सिनेमातील 'तो' डायलॉग अन् देशात उसळलेली मोदी लाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:46 IST

हा डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे.

ठळक मुद्दे'मोदी हटाओ'चा विडाच उचललेल्या विरोधकांना नरेंद्र मोदींनी अक्षरशः झोपवले. 'रेस' सिनेमातील एक डायलॉग मोदींच्या यशाचं गमक सांगून जाणारा वाटतो.

'फिर एक बार... मोदी सरकार', 'अब की बार... तीन सौ पार', असा निर्धार करूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे 'राईट हँड' भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे लाखो कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २०१४ मध्ये जसं वातावरण होतं, तसं यावेळी नव्हतं - किंबहुना ते दिसत नव्हतं असं आता म्हणावं लागेल. त्यामुळे स्वाभाविकच २०१९चा महासंग्राम त्यांच्यासाठी सोपा नव्हता. परंतु, त्यांनी दिलेले दोन्ही नारे खरे 'करून दाखवले' आणि 'मोदी हटाओ'चा विडाच उचललेल्या विरोधकांना अक्षरशः झोपवले. देशात 'मोदी त्सुनामी'च उसळली. या अतिविराट यशामागे काय कारणं आहेत, यावर तज्ज्ञ मंडळी विचारमंथन करत आहेत. एअर स्ट्राईक, हिंदूराष्ट्रवादाचा मुद्दा, प्रचारात विरोधकांना भरकटवण्याची खेळी इथपासून ते सक्षम पर्याय नसण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. ही कारणमीमांसा करताना, 'रेस' सिनेमातील एक डायलॉग मोदींच्या यशाचं गमक सांगून जाणारा वाटतो.

सैफ अली खान आणि अक्षय खन्ना हे दोघं 'रेस' सिनेमात भाऊ असतात. मोठा भाऊ सैफचं यश अक्षयच्या डोळ्यात खुपत असतं, डोक्यात जात असतं. त्यामुळे तो त्याला हरवण्यासाठी बरीच कारस्थानं करत असतो. अक्षयवर जीव ओवाळून टाकणाऱ्या सैफला हे सगळं समजतं आणि मग तो त्याचाच डाव त्याच्यावर उलटवून 'रेस' जिंकतो, अशी सिनेमाची गोष्ट. या सिनेमात सैफचा एक डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे. आश्चर्य म्हणजे, हा डायलॉग लोकसभा निकालांना तंतोतंत लागू पडतो. 

सैफ अली खान अक्षयला म्हणतो,  'तुम कभी जीत नही पाए क्यूं की तुम हमेशा मुझे हराने की सोचते थे, और मैं कभी हारा नहीं, क्यूं की मैं हमेशा जितने की सोचता था'

लोकसभा निवडणुकीच्या 'रेस'मध्येही हेच तर झालं. देशभरातील पाच-दहा नव्हे तर २०-२२ पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी मैदानात उतरले होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जेडीएस, डावे आणि अनेक. प्रत्येक जण प्रत्येक सभेमध्ये, चर्चांमध्ये एकच गोष्ट सांगत होता - मोदींना मत देऊ नका, त्यांना पराभूत करा, सत्तेतून खाली खेचा. महाराष्ट्रात तर, एकही जागा न लढवणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला काय आवाहन केलं होतं आठवा. मोदी आणि शहा या दोघांना राजकीय क्षितिजावरून कायमचं दूर करा, असं त्यांनी म्हटलं होतं. याउलट, नरेंद्र मोदी प्रत्येक प्रचारसभेत जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत होते. पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी, भाजपाच्या विजयासाठी मतांचा जोगवा मागत होते. तो मतदारांनी त्यांना दिल्याचं निकालातून स्पष्ट झालं. पाच वर्षं त्यांनी चालवलेलं सरकार, त्यांची ध्येय-धोरणं, निर्णय, त्यांनी मांडलेले मुद्दे, त्यांनी केलेला प्रचार किती योग्य, किती अयोग्य हा वादाचा विषय; पण जनादेश त्यांनी जिंकला आहे आणि लोकशाहीत त्याहून मोठं काहीच नाही.  

नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचारांमध्ये अधिक सामर्थ्य असतं, हे आपल्याला प्रत्येकालाच ठाऊक आहे. सैफ अली खानचा डायलॉग वेगळ्या शब्दांत तेच सांगतो. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही ते समजत होतं. पण, त्यांची थोडी गल्लत झाली. त्यांनी मोदींची गळाभेट घेणारे, प्रेम करणं ही संस्कृती असल्याचं म्हटलं. पण, 'आम्हाला जिंकवा' असं सांगण्याऐवजी 'त्यांना पाडा' यावरच त्यांचा भर होता. याउलट, जनतेची नस ओळखलेल्या मोदींनी बहुधा विजयाचं सूत्र अचूक हेरलं आणि 'लाटे'चं रूपांतर 'त्सुनामी'त केलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अर्थात, आता इथून पुढेही त्यांना हाच सकारात्मक विचार पुढे न्यावा लागेल, हे नक्की!

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी