शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Lok Sabha  Election: पुढील लोकसभा भाजपासोबत लढणार?; जुन्या मित्र पक्षाने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 09:23 IST

Politics News: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते. शिवसेना, अकाली दल हे सर्वात जुने मित्र होते. शिवसेनेने तीन वर्षांपूर्वी राज्यात निवडणूक झाल्यावर भाजपाची साथ सोडली, तर अकाली दलाने कृषी कायद्यांवरून साथ सोडली. परंतू आता अकाली दलाने पुढील लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. 

पंजाबमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यात दोन पक्षांना मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसची सत्ता गेली तर ज्या निवडणूकीवर डोळा ठेवून कृषी कायद्यांवरून राजकारण करण्यासाठी शिरोमणि अकाली दलाने केंद्रातील सत्ता सोडली त्यांचाही दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगले आहे. 

शिरोमणि अकाली दलाचे सेक्रेटरी जनरल सरदार बलविंदर सिंह भूंदड़ यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पुढची लोकसभा पुन्हा भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. जर काँग्रेसने कॅप्टनना हटविले नसते तर अशी वेळ आली नसती. परंतू आपला एवढे मतदान होणे ही आश्चर्याची बाब आहे. सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे लोकांना वाटले काहीतरी नवीन ट्राय करूया, यामुळे त्यांनी आपला निवडून दिल्याचे म्हटले. 

कोणताही पक्ष आम्हाला संपवू शकत नाही. आमचा पक्ष गावागावात पोहोचलेला आहे. तीन महिन्यांनंतर आपला जनतेचा रोष सहन करावा लागणार आहे. भाजपानेही काही प्रगती केली नाही. जर आम्ही सोबत असतो तर काहीतरी फरक दिसला असता. २०२४ मध्ये आम्ही पुन्हा एकत्र लढण्याची शक्यता आहे, नक्की नाही. अजून कोणताही निर्णय झालेला नाही, यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल, असे भूंदड़ यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BJPभाजपाPunjabपंजाबShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल