शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Lok Sabha  Election: पुढील लोकसभा भाजपासोबत लढणार?; जुन्या मित्र पक्षाने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 09:23 IST

Politics News: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते. शिवसेना, अकाली दल हे सर्वात जुने मित्र होते. शिवसेनेने तीन वर्षांपूर्वी राज्यात निवडणूक झाल्यावर भाजपाची साथ सोडली, तर अकाली दलाने कृषी कायद्यांवरून साथ सोडली. परंतू आता अकाली दलाने पुढील लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. 

पंजाबमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यात दोन पक्षांना मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसची सत्ता गेली तर ज्या निवडणूकीवर डोळा ठेवून कृषी कायद्यांवरून राजकारण करण्यासाठी शिरोमणि अकाली दलाने केंद्रातील सत्ता सोडली त्यांचाही दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगले आहे. 

शिरोमणि अकाली दलाचे सेक्रेटरी जनरल सरदार बलविंदर सिंह भूंदड़ यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पुढची लोकसभा पुन्हा भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. जर काँग्रेसने कॅप्टनना हटविले नसते तर अशी वेळ आली नसती. परंतू आपला एवढे मतदान होणे ही आश्चर्याची बाब आहे. सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे लोकांना वाटले काहीतरी नवीन ट्राय करूया, यामुळे त्यांनी आपला निवडून दिल्याचे म्हटले. 

कोणताही पक्ष आम्हाला संपवू शकत नाही. आमचा पक्ष गावागावात पोहोचलेला आहे. तीन महिन्यांनंतर आपला जनतेचा रोष सहन करावा लागणार आहे. भाजपानेही काही प्रगती केली नाही. जर आम्ही सोबत असतो तर काहीतरी फरक दिसला असता. २०२४ मध्ये आम्ही पुन्हा एकत्र लढण्याची शक्यता आहे, नक्की नाही. अजून कोणताही निर्णय झालेला नाही, यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल, असे भूंदड़ यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BJPभाजपाPunjabपंजाबShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल