शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:11 IST

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. महात्मा गांधींना चित्रपट येण्यापूर्वी कोणीही ओळखत नव्हतं असं विधान मोदींनीं केलं आहे.

Narendra Modi on Mahatma Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी पक्ष, विरोधक आणि देशासंबंधीच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक भावना उघड केल्या. विरोधकांमध्ये तुम्हाला कोणता नेता आवडतो असे विचारले असता, पंतप्रधानांनी मुत्सद्दी भूमिका कायम ठेवली आणि नाव सांगण्यास नकार दिला. पण नेत्यांसोबत असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांची कबुली दिली. यावेळी मोदींनी  अनेकदा सोनिया गांधींच्या आरोग्याच्या प्रश्नादरम्यान पाठिंबा देण्यासारख्या उदाहरणांचाही उल्लेख केला. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.

महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा चित्रपट बनला तेव्हा जगभरात त्यांच्याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं आहे. महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केलं नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

"१९व्या दशकातील कायदे मला २१ व्या दशकात बदलावे लागत आहेत. हे आधीच व्हायला हवं होतं. आता प्रश्न फक्त आपल्या तीर्थक्षेत्रांचा नाही. महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. पण गेल्या ७५ वर्षात महात्मा गांधी यांना जगाने ओळखावं ही आपली जबाबदारी नव्हती का?मला माफ करा पण त्यांना कोणीही ओळखत नाही. पहिल्यांदा महात्मा गांधी चित्रपट तयार झाला तेव्हा जगभरात गांधी कोण आहेत? याबाबत कुतूहल निर्माण झालं. आपण हे केलं नाही. हे देशाचं काम होतं. जर मार्टिन ल्यूथर किंग यांना जग ओळखतं. नेन्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रोहित पवारांची टीका

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. "गांधी विचार म्हणून ज्यांचे विचार जगभर अजरामर आहेत, ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि उपोषण व सत्याग्रहाचं अस्त्र दिलं, ज्यांचे आदर्श म्हणून जगभर पुतळे उभारले गेले त्या ‘महात्मा गांधीजींना जगात कुणी ओळखत नव्हतं,’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आहे. ही टेलिप्रॉम्प्टरची चूक आहे की वैचारिक दारिद्र्य असलेल्या अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या ब्रीफची, हे कळत नाही. तसं असेल तर अशा अधिकाऱ्यांना मोदी साहेबांनी तातडीने दूर केलं पाहीजे. जेणेकरुन चुकीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानपदाची गरीमा कमी होणार नाही आणि राष्ट्रपुरुषाबाबत चुकीची माहितीही प्रसारीत होणार नाही. शिवाय गांधी हा विचार असल्याने त्याला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज नसते. हा विचार लोक स्वतःहूनच स्वीकारत असतात," असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस