शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:04 IST

18 व्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सभागृहातील नेत्यांमधील केमिस्ट्री बदलली आहे.

Lok Sabha Election : काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या अन् देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA चे सरकार स्थापन झाले. पण, या 18व्या लोकसभेचे चित्र 2014 आणि 2019 च्या लोकसभेपेक्षा वेगळे असणार आहे. त्याची झलक बुधवारी(दि.26) लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी दिसून आली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष संख्याबळाच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत कमकुवत झाला आहे, त्यामुळे विरोधकांनाही एक नवसंजिवणी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद झाल्यामुळे विरोधकांमध्ये वेगळीच उर्जा आली आहे. त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील केमिस्ट्रीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज भाजप नेते ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर सभागृहात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाली. लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या स्थानापर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उठले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही बोलावले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत-हसत एकमेकांना हस्तांदोलन केले. एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांनी आपुलकीने हस्तांदोलन केल्यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. आता आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी असेल.

यापूर्वी राहुल गांधींनी मोदींना मिठी मारलेलीराहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. बुधवारी सभागृहात राहुल आणि मोदींनी हस्तांदोलन केल्यानंतर अनेकांना जुलै 2018 ची घटना आठवली. सुमारे सहा वर्षांपूर्वी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सभागृहात बसलेल्या पंतप्रधान मोदींना थेट मिठी मारली होती. त्यावेळी राहुल यांनी सभागृहात जोरदार भाषणही केले होते. आपल्या भाषणात ते देशातील द्वेषाच्या वातावरणावर बोलत होते. यावेळी प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना मिठी मारली. मात्र, त्यावेळी राहुल गांधींच्या या कृतीची सत्ताधाऱ्यांनी खिल्ली उडवली होती. 

संख्याबळाने चित्र बदललेराजकारणात नेत्यांची सर्वात मोठी ताकद त्यांच्या पक्षाचे खासदार आणि आमदार असतात. या संख्यात्मक ताकदीच्या जोरावरच नेता सर्वोच्च पदावर पोहोचतो. त्या आधारावर त्यांची लोकप्रियता आणि गांभीर्य ठरवले जाते. ही संख्या कमी असेल, तर त्यांची प्रतिमा कमकुवत नेत्याची बनते. हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 100 टक्के लागू होते. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेस खासदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेतले जात नव्हते. पण, आता विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा