शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:04 IST

18 व्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सभागृहातील नेत्यांमधील केमिस्ट्री बदलली आहे.

Lok Sabha Election : काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या अन् देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA चे सरकार स्थापन झाले. पण, या 18व्या लोकसभेचे चित्र 2014 आणि 2019 च्या लोकसभेपेक्षा वेगळे असणार आहे. त्याची झलक बुधवारी(दि.26) लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी दिसून आली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष संख्याबळाच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत कमकुवत झाला आहे, त्यामुळे विरोधकांनाही एक नवसंजिवणी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद झाल्यामुळे विरोधकांमध्ये वेगळीच उर्जा आली आहे. त्यामुळेच आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील केमिस्ट्रीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज भाजप नेते ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर सभागृहात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाली. लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या स्थानापर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उठले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही बोलावले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत-हसत एकमेकांना हस्तांदोलन केले. एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांनी आपुलकीने हस्तांदोलन केल्यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. आता आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी असेल.

यापूर्वी राहुल गांधींनी मोदींना मिठी मारलेलीराहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. बुधवारी सभागृहात राहुल आणि मोदींनी हस्तांदोलन केल्यानंतर अनेकांना जुलै 2018 ची घटना आठवली. सुमारे सहा वर्षांपूर्वी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सभागृहात बसलेल्या पंतप्रधान मोदींना थेट मिठी मारली होती. त्यावेळी राहुल यांनी सभागृहात जोरदार भाषणही केले होते. आपल्या भाषणात ते देशातील द्वेषाच्या वातावरणावर बोलत होते. यावेळी प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना मिठी मारली. मात्र, त्यावेळी राहुल गांधींच्या या कृतीची सत्ताधाऱ्यांनी खिल्ली उडवली होती. 

संख्याबळाने चित्र बदललेराजकारणात नेत्यांची सर्वात मोठी ताकद त्यांच्या पक्षाचे खासदार आणि आमदार असतात. या संख्यात्मक ताकदीच्या जोरावरच नेता सर्वोच्च पदावर पोहोचतो. त्या आधारावर त्यांची लोकप्रियता आणि गांभीर्य ठरवले जाते. ही संख्या कमी असेल, तर त्यांची प्रतिमा कमकुवत नेत्याची बनते. हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 100 टक्के लागू होते. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेस खासदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेतले जात नव्हते. पण, आता विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा