शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 04:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.

संजय शर्मा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना वेगवेगळी पत्रे लिहून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचे धोरण स्पष्ट केले आहे. या पत्रामध्ये लिहिलेले मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवावे आणि काँग्रेस पक्षाला विभाजनवादी असल्याचे उघडपणे सांगावे, असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रल्हाद जोशी, एसपी सिंह बघेल, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ९३ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

पत्रातील मुद्दे काय?

 काँग्रेसच्या विभाजनवादी धोरणांबाबत मतदारांना माहिती द्यावी.

 काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाचे आरक्षण काढून घेऊन धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छिते.

 धर्माच्या नावावरील आरक्षण अनैतिक असले तरी व्होट बँकेसाठी काँग्रेस असे गैरप्रयत्न करीत आहे.

 वारसा कर लागू करणे ही काँग्रेसची धोकादायक कल्पना असल्याचे सांगून पंतप्रधानांनी देशातील जनतेला याची जाणीव करून द्या.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यापर्यंत विविध मुद्द्यांवर भाजप उमेदवारांच्या नावे पंतप्रधान मोदी यांची पत्रे तयार आहेत.

 निवडणुकीचा जो टप्पा पूर्ण होईल, त्यानंतर लगेच पुढील टप्प्यातील उमेदवारांची पत्रे पाठवली जातील. प्रत्येक निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे असतील.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक