शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 04:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.

संजय शर्मा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना वेगवेगळी पत्रे लिहून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचे धोरण स्पष्ट केले आहे. या पत्रामध्ये लिहिलेले मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवावे आणि काँग्रेस पक्षाला विभाजनवादी असल्याचे उघडपणे सांगावे, असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रल्हाद जोशी, एसपी सिंह बघेल, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ९३ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

पत्रातील मुद्दे काय?

 काँग्रेसच्या विभाजनवादी धोरणांबाबत मतदारांना माहिती द्यावी.

 काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाचे आरक्षण काढून घेऊन धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छिते.

 धर्माच्या नावावरील आरक्षण अनैतिक असले तरी व्होट बँकेसाठी काँग्रेस असे गैरप्रयत्न करीत आहे.

 वारसा कर लागू करणे ही काँग्रेसची धोकादायक कल्पना असल्याचे सांगून पंतप्रधानांनी देशातील जनतेला याची जाणीव करून द्या.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यापर्यंत विविध मुद्द्यांवर भाजप उमेदवारांच्या नावे पंतप्रधान मोदी यांची पत्रे तयार आहेत.

 निवडणुकीचा जो टप्पा पूर्ण होईल, त्यानंतर लगेच पुढील टप्प्यातील उमेदवारांची पत्रे पाठवली जातील. प्रत्येक निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे असतील.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक