शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

लोकसभा निवडणूक; काँग्रेसचे मिशन ३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:32 IST

कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींना सर्वाधिकार

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेतेपी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला.या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.शोषित-पीडितांसाठी काँग्रेसने लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी या बैठकीत केले, तर मोदी सरकारचे आता रिव्हर्स काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. नरेंद्र मोदी निराश आहेत. तसे त्यांच्या शब्दबंबाळ भाषणांतूनही दिसून येत आहे, असेही त्या म्हणाल्या.दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब, विविध यंत्रणा व घटनात्मक संस्था यांच्यावर भाजपा पद्धतशीरपणे हल्ले चढवत आहे, असल्याचा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसच हा भारताचा खरा आवाज (व्हॉइस आॅफ इंडिया) आहे. पक्षाच्या मतदारांचा पाया विस्तारणे हे आपल्यापुढील महत्त्वाचे लक्ष्य आहे. ज्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मते दिली नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचा विश्वास संपादन करा, असा संदेशही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.जुमले रचण्यात मोदी दंगमोदी आत्मस्तुती व निवडणूक जुमले रचण्यात कायम दंग असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून दाखवण्याच्या मोदी यांच्या दाव्याचा फोलपणा दाखवून देताना ते म्हणाले की, त्यासाठी कृषी क्षेत्राचा दर १४ टक्के हवा. पण तो दृष्टिक्षेपातच नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLoksabhaलोकसभा