शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 05:31 IST

राज्यातील ११ जागांसह २९८ उमेदवारांचे भाग्य होणार ईव्हीएमबंद; आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेसाठी लढत

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानावेळी उष्णतेच्या लाटेचा मतदारांना सामना करावा लागला होता. परंतु, सोमवारी (दि. १३) होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी राज्यासह देशातील विविध भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाचा अंदाज घेत मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भाग्य सीलबंद होणार आहे.

चौथ्या टप्प्यात होणाऱ्या ९६ जागांपैकी ६६ जागा आंध्र प्रदेश (२५), तेलंगणा (१७), उत्तर प्रदेश (१३) व महाराष्ट्र (११) या चार राज्यांतील आहेत. त्यामुळे या टप्प्यातील प्रचारावेळीही प्रमुख पक्षांकडून या चार राज्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. चौथा टप्पा संपताच देशातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३८० म्हणजेच ७० टक्के मतदारसंघातील रणधुमाळी संपणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ १६३ मतदारसंघ शिल्लक राहतील.

आंध्र, ओडिशातही रणधुमाळी  

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासह आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ व ओडिशातील पहिल्या टप्प्यातील २८ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सत्ता मिळविण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे ओडिशात चार टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बीजेडीचे नवीन पटनायक यांची सत्ता आहे. परंतु, यंदा भाजपनेही चांगलाच जोर लावला आहे. 

लोकसभेचा चौथा टप्पा

लोकसभेच्या एकूण जागा ९६, निवडणूक होत असलेली राज्ये/ केंद्रशासित प्रदेश १०, महाराष्ट्रात ११ जागा

मतदारसंघ उमेदवारनंदुरबार     ११जळगाव     १४रावेर     २४जालना     २६औरंगाबाद ३७मावळ     ३३पुणे     ३५शिरुर     ३२अहमदनगर २५शिर्डी     २०बीड     ४१

पारा घसरला, आता टक्का उसळू द्या!

मुंबई : वादळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात घसरण झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. चौथ्या टप्प्यातील ११ पैकी ९ मतदारसंघांत सोमवारी कमाल तापमान ४० अंशांच्या आत राहणार आहे.

किती आहे तापमान?

नंदुरबार : ४०, जळगाव : ४०, रावेर : ३८, जालना : ३७, पुणे : ३४, शिरूर : ३५, मावळ : ३४, अहमदनगर : ३६, शिर्डी : ३६, बीड : ३५, औरंगाबाद : ३४, (स्त्रोत : ॲक्यूवेदर)

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान