शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 05:31 IST

राज्यातील ११ जागांसह २९८ उमेदवारांचे भाग्य होणार ईव्हीएमबंद; आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेसाठी लढत

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या मतदानावेळी उष्णतेच्या लाटेचा मतदारांना सामना करावा लागला होता. परंतु, सोमवारी (दि. १३) होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी राज्यासह देशातील विविध भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाचा अंदाज घेत मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भाग्य सीलबंद होणार आहे.

चौथ्या टप्प्यात होणाऱ्या ९६ जागांपैकी ६६ जागा आंध्र प्रदेश (२५), तेलंगणा (१७), उत्तर प्रदेश (१३) व महाराष्ट्र (११) या चार राज्यांतील आहेत. त्यामुळे या टप्प्यातील प्रचारावेळीही प्रमुख पक्षांकडून या चार राज्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. चौथा टप्पा संपताच देशातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३८० म्हणजेच ७० टक्के मतदारसंघातील रणधुमाळी संपणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ १६३ मतदारसंघ शिल्लक राहतील.

आंध्र, ओडिशातही रणधुमाळी  

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासह आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ व ओडिशातील पहिल्या टप्प्यातील २८ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सत्ता मिळविण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे ओडिशात चार टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बीजेडीचे नवीन पटनायक यांची सत्ता आहे. परंतु, यंदा भाजपनेही चांगलाच जोर लावला आहे. 

लोकसभेचा चौथा टप्पा

लोकसभेच्या एकूण जागा ९६, निवडणूक होत असलेली राज्ये/ केंद्रशासित प्रदेश १०, महाराष्ट्रात ११ जागा

मतदारसंघ उमेदवारनंदुरबार     ११जळगाव     १४रावेर     २४जालना     २६औरंगाबाद ३७मावळ     ३३पुणे     ३५शिरुर     ३२अहमदनगर २५शिर्डी     २०बीड     ४१

पारा घसरला, आता टक्का उसळू द्या!

मुंबई : वादळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात घसरण झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. चौथ्या टप्प्यातील ११ पैकी ९ मतदारसंघांत सोमवारी कमाल तापमान ४० अंशांच्या आत राहणार आहे.

किती आहे तापमान?

नंदुरबार : ४०, जळगाव : ४०, रावेर : ३८, जालना : ३७, पुणे : ३४, शिरूर : ३५, मावळ : ३४, अहमदनगर : ३६, शिर्डी : ३६, बीड : ३५, औरंगाबाद : ३४, (स्त्रोत : ॲक्यूवेदर)

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान