शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 08:43 IST

Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आज महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिथे राज्यातील सर्व जागांवर मतदान होत आहे. त्यामध्ये तामिळनाडू (३९ जागा), उत्तराखंड (५ जागा), अरुणाचल प्रदेश (२ जागा), मेघालय (२ जागा), अंदमान आणि निकोबार (१ जागा), मिझोराम (१ जागा), नागालँड (१ जागा), पुदुचेरी (१ जागा), सिक्किम (१ जागा), आणि लक्षद्वीप (१ जागा) यांचा समावेश आहे. तर राजस्थान (१२ जागा), उत्तर प्रदेश (८ जागा), मध्य प्रदेश (६ जागा), आसाम (५ जागा), महाराष्ट्र (५ जागा), बिहार (४ जागा). पश्चिम बंगाल (३ जागा), मणिपूर (२ जागा), त्रिपुरा, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एखा जागेवर आज मतदान होत आहे. 

त्याबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीचं मतदानही आज होत आहे. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभेच्या ६० आणि सिक्कीममधील विधानसभेच्या ३२ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचं भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आणि विशेषकरून तरुण मतदारांना अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून मतदानाला सुरुवात होत आहे. २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील १०२ जागांवर मतदान होत आहे. येथील मतदारांना मी अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करत आहे. तसेच तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करावं. प्रत्येक मत महत्त्वपूर्ण असतं, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या आवाहनामध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानIndiaभारतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४