शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 09:31 IST

Lok Sabha Election 2024 Rajnath Singh And Arvind Kejriwal : राजनाथ सिंह यांनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि आप लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले 'आप' नेते (अरविंद केजरीवाल) जे बोलतात ते कधीच करत नाहीत हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्यांनी अण्णा हजारेंसोबत आंदोलन केलं. तेव्हा अण्णा यांनी त्यांना राजकीय पक्ष काढू नका असं सांगितलं. पण केजरीवालांनी आपल्या गुरुचं देखील ऐकलं नाही. 

राजनाथ सिंह यांनी आरोप केला की, "ते म्हणाले होते जेव्हा ते मुख्यमंत्री होतील तेव्हा ते सरकारी निवासस्थानात राहणार नाहीत, तर स्वतःच्या घरात राहतील. पण नंतर त्यांनी शीशमहाल बांधला. जगभरात आपल्या देशाचा आदर वाढला आहे. पैसा आणि संसाधनांचा विचार केला तर पूर्वी भारत हा गरीब देश मानला जात होता. काँग्रेसच्या काळात आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींनी जादू केली आणि 8 वर्षांत आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे."

याआधी राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील एका निवडणूक सभेत म्हटलं होतं की, "यावेळची निवडणूक ही कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठीची निवडणूक नाही, तर ही निवडणूक देश घडवण्याची निवडणूक आहे. भारताच्या राजकारणात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने विश्वासार्हतेवर संकट निर्माण केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही." 

"भाजपा हा देशातील एकमेव असा पक्ष आहे ज्याने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत, मग ते जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे आश्वासन असो किंवा अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर बांधण्याचं वचन असो" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा