शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 20:14 IST

राहुल गांधींनी थेट मोदी, शाह आणि सीतारामन यांना जबाबदार धरुन जेपीसीची मागणी केली आहे.

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले. 400 पारची घोषणा करणाऱ्या भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पण, मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात भाजपचेच सरकार येणार आहे. एकीकडे सरकार स्थापनेची तयारी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालाच्या दिवशी शेअर बाजारातील प्रचंड घसरणीबाबत मोठा दावा केला आहे. बाजारातील घसरणीसाठी त्यांनी थेट नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जबाबदार धरले असून, जेपीसीची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांचे मतदान 1 जून 2024 रोजी संपले. मात्र त्याआधी अनेक मुलाखतीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी, म्हणजेच 4 जून रोजी शेअर बाजारात विक्रमी वाढ होण्याची आशा व्यक्त केली होती. यानंतर 1 जून रोजी मतदानाचा सातवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल येऊ लागले आणि जवळपास सर्वच ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 

एक्झिट पोलच्या दिवशी काय झाले?1 जून (शनिवार) रोजी एक्झिट पोल आला आणि सोमवार( 3 जून) रोजी शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक वाढ दिसून आली. 3 जून रोजी, म्हणजेच निवडणूक निकालाच्या आदल्या दिवसी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 2000 हून अधिक अंकांच्या उसळीसह उघडला आणि 76,738.89 च्या नवीन उच्चांकावर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 2507.47 अंकांच्या किंवा 3.39 टक्क्यांच्या वाढीसह 76,468.78 च्या पातळीवर बंद झाला. 

सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 600 अंकांच्या वाढीसह उघडला आणि ट्रेडिंगच्या अल्पावधीत 23,338.70 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. पण, बाजार बंद होईपर्यंत हा 733.20 अंक किंवा 3.25 टक्क्यांच्या वाढीसह 23,263.90 वर बंद झाला. 3 जून रोजी बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी सुमारे 13 लाख कोटी रुपये कमावले होते.

4 जून रोजी काय झाले?4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल आले अन् बीएसई सेन्सेक्स दुपारी 12.20 पर्यंत 6094 अंकांनी घसरुन 70,374 च्या पातळीवर आला. दुसरीकडे, निफ्टी निर्देशांक सुमारे 1947 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 21,316 च्या पातळीवर पोहोचला. कोरोनाच्या कालावधीनंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण होती. शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसईचे मार्केट कॅप एकाच दिवसात सुमारे 31 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

राहुल गांधींनी काय म्हटले?आता या बाजारातील घसरणीबाबत राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत शेअर बाजाराचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, बाजारातील घसरण हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याची जेपीसी चौकशी व्हायला हवी. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांनी 4 जून रोजी शेअर बाजारात विक्रमी वाढ होण्याची अपेक्षा का व्यक्त केली होती? त्यांनी लोकांना शेअर्स खरेदी करण्यास का सांगितले? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालRahul Gandhiराहुल गांधीshare marketशेअर बाजारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी