शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 19:59 IST

'चौकीदार चोर है, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब, हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.'

Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शुक्रवारी माध्यमाशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणतात, 'पीएम मोदींच्या कुटुंबावर भाष्य करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. मोदींवरील वैयक्तिक टीका विरोधकांनाच अडचणीत आणतात.' दरम्यान, अब्दुल्ला यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे.

अलीकडेच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबाबाबत टीका केली होती. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत 'चौकीदार चोर है'चा नारा देण्यात आला, तो विरोधकांवर उलटला. मी अशा घोषणांच्या बाजूने कधीच नव्हतो आणि या घोषणांमुळे आम्हाला कधीही फायदा झालेला नाही. अशा घोषणांमुळे विरोधकांचेच नुकसान होते. मतदारांना अशा घोषणांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना आज त्यांच्यासमोरील समस्या कशा सुटतील, हे जाणून घ्यायचे आहे.' 

लालू यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'त्या वक्तव्यावरुन आम्हीच त्यांना ओपन गोल पोस्ट दिला आहे. आता ते या संधीचा फायदा घेत आहेत. याचे उत्तर आता आमच्याकडे नाही. मी एवढेच म्हणेन की, आपण असे वैयक्तिक राजकारण करू नये, तर जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत. चौकीदार, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब- हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.'

'मोदींच्या भाषणात काहीच नवीन नव्हते'यावेळी अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदींच्या श्रीनगरमधील भाषणावरही टीका केली. 'पंतप्रधानांच्या भाषणात नवीन काहीच नव्हते. ज्या गोष्टींबद्दल ते नेहमी बोलतात, त्याच गोष्टी पंतप्रधानांनी बोलल्या. लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधानांनीही काहीही स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधान मोदी स्वत: निवडणुकीची घोषणा करू शकत नसले तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या 31 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी विधानसभा निवडणुका घेण्याबाबत त्यांनी निश्चितपणे माहिती द्यायला हवी होती. मुदतीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे त्यांनी जनतेला सांगायला हवे होते. पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याबद्दल सांगायला हवे होते. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार पॅकेज जाहीर करायला हवे होते. पण पंतप्रधान यापैकी एकाही मुद्द्यावर बोलले नाहीत,' अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOmar Abdullahउमर अब्दुल्लाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी