शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:21 IST

२०६ सभा, रोड शो अन् ८० मुलाखती देत पंतप्रधानांनी केला विक्रम

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी संपला असून, कोणत्याही निवडणुकीच्या मुद्द्याशिवाय निवडणुकीचा प्रचार संपला आहे. राम मंदिर, कलम ३७०, सीएए, एनआरसी यासह कोणताही राष्ट्रीय मुद्दा या निवडणुकीत चालला नाही. पूर्ण निवडणूक ही संविधान संपविण्याबाबत आणि संविधान वाचविण्यावर झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिकची संपूर्ण मदार प्रदेशातील ८० आणि बिहारमधील ४० जागांवर आहे.

प्रचारादरम्यान मोदींनी २०६ सभा आणि रोड शो करून विक्रम केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीत न जाणे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली.

दोन राज्यांवर बरेच काही अवलंबून

  • २०१९ च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या, तर येथे भाजपच्या जागा कमी होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
  • २०१९ मध्ये बिहारमध्ये एनडीए युतीने राज्यातील सर्व ४० जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी १७ जागा भाजपने, १७ जदयू आणि ६ जागा लोक जनशक्ती पक्षाने जिंकल्या होत्या. मात्र या वेळी बिहारमध्ये भाजप आणि एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. या दोन राज्यांत भाजप किती जागा जिंकतो यावर बरेच काही अवलंबून आहे.

महाराष्ट्रातील नुकसान कुठे भरून काढणार? 

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये होत असलेले नुकसान पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणामधून भरून काढण्याचा दावा भाजप करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये २०१९ मध्ये भाजपने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये भाजपने २०१९ मध्ये २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी