शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:21 IST

२०६ सभा, रोड शो अन् ८० मुलाखती देत पंतप्रधानांनी केला विक्रम

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी संपला असून, कोणत्याही निवडणुकीच्या मुद्द्याशिवाय निवडणुकीचा प्रचार संपला आहे. राम मंदिर, कलम ३७०, सीएए, एनआरसी यासह कोणताही राष्ट्रीय मुद्दा या निवडणुकीत चालला नाही. पूर्ण निवडणूक ही संविधान संपविण्याबाबत आणि संविधान वाचविण्यावर झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिकची संपूर्ण मदार प्रदेशातील ८० आणि बिहारमधील ४० जागांवर आहे.

प्रचारादरम्यान मोदींनी २०६ सभा आणि रोड शो करून विक्रम केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीत न जाणे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली.

दोन राज्यांवर बरेच काही अवलंबून

  • २०१९ च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या, तर येथे भाजपच्या जागा कमी होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
  • २०१९ मध्ये बिहारमध्ये एनडीए युतीने राज्यातील सर्व ४० जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी १७ जागा भाजपने, १७ जदयू आणि ६ जागा लोक जनशक्ती पक्षाने जिंकल्या होत्या. मात्र या वेळी बिहारमध्ये भाजप आणि एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. या दोन राज्यांत भाजप किती जागा जिंकतो यावर बरेच काही अवलंबून आहे.

महाराष्ट्रातील नुकसान कुठे भरून काढणार? 

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये होत असलेले नुकसान पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणामधून भरून काढण्याचा दावा भाजप करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये २०१९ मध्ये भाजपने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये भाजपने २०१९ मध्ये २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी