शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:13 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे. आता भाजपाकडून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक गावाकडे चला अभियान सुरू करण्यात येणार आहे. हे अभियान जवळपास ४० दिवस चालणार आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून भाजपा १ लाख ४० हजार गावांपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक गावाकडे चला अभियानाच्या माध्यमातून भाजपा  नेते गावोगावी जाऊन लोकांशी थेट संपर्क साधणार आहेत.  

प्रत्येक गावाकडे चला अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे नेते गावोगावी जाणार आहेत. तसेच तिथे बैठका घेणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या  योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहेत. त्याशिवाय सरकार जनतेसाठी आणखी काय करू शकतं याबाबत गावातील लोकांचं मतही विचारात घेणार आहेत. तसेच या अभियानादरम्यान गावोगावी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची माहितीही भाजपा नेते जनतेला देतील. 

भाजपाचं प्रत्येक गावात चला  अभियान जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील १ लाख ४० हजार गावांमध्ये भाजपाचे नेते पोहोचतील. तसेच ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधणार आहे. दररोज प्रत्येक जिल्ह्यातील ५ ते ८ गावांना भेट देण्याची भाजपाची रणनीती आहे. यात लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदांच्या विकसित भारत संकल्पाबाबत माहिती दिली जाईल. 

भाजपाचं हे अभियान आगामी निडणुकीत गेमचेंजर ठरू शकतं, असा दावा केला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी मतदारांशी थेट संपर्क साधला जाणार आहे. तसेच त्यांनी लाभ घेतलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याशिवाय प्रत्येक गावात चला या मोहिमेमधून १ लाख ४० हजार गावांतील लोकांपर्यंत थेट संपर्क साधला जाणार आहे. त्याचाही थेट फायदा भाजपाला होऊ शकतो. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक