शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 21:46 IST

लोकसभा निवडणुकीसाठी माकपा नेतृत्वातील डाव्या आघाडीने गुरुवारी आपले उमेदवार जाहीर केले.

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसलापश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनंतर आणखी एका पक्षाने मोठा धक्का दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने गुरुवारी काँग्रेसशी चर्चा न करता आपल्या 16 उमेदवारांची घोषणा केली. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या 42 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. 

सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडीची मुठ बांधली. पण, एक एक करत यातील पक्ष आघाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, टीएमसी आणि डाव्यांची आघाडी होण्याची शक्यता होती. पण, आधी टीएमसी आणि आता डाव्यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दोन जागांची ऑफर देऊ केली होती, पण काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. यामुळे ममतांनी राज्यात स्वबळाचा मार्ग स्वीकारत 42 जागांसाठी उमेदवार जाहीर केले.

दुसरीकडे, डाव्या पक्षांनीही काँग्रेसशी चर्चा न करता 16 जागांवर उमेदवार जाहीर केले. उर्वरित जागांवर दोन दिवसांनी निर्णय होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. डाव्यांच्या या भूमिकेवरून काँग्रेससोबत जागावाटपावर आजतागायत एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमन बसू म्हणाले की, बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याशी जागावाटपाबाबतची चर्चा अनिर्णित राहिली. पण, अजूनही जागावाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी काँग्रेससाठी दरवाजे खुले आहेत. काँग्रेसने योग्य प्रस्ताव आणल्यास तडजोड होऊ शकते. 

टॅग्स :congressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगालlok sabhaलोकसभाtmcठाणे महापालिका