शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:11 IST

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे. मात्र, अजूनही काही जागा अशा आहेत की, जिथे पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशातील या दोन जागा एकेकाळी गांधी घराण्याच्या बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपाने विजय मिळवला. येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती, जिथून ते जिंकले होते. त्याचवेळी सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या, पण आता त्या राज्यसभा सदस्य आहेत. अशा स्थितीत दोन्ही जागा आता गांधी घराण्याच्या हातात राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच यावेळी या दोन जागांवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

जयराम रमेश यांना विचारण्यात आले की, अमेठी-रायबरेली मतदारसंघातून उमेदवार कोण? याला उत्तर देताना ते म्हणाले की, उमेदवारांबाबत काँग्रेस निवडणूक समिती (सीईसी) निर्णय घेईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी अमेठी-रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस संघटनेलाही तेच हवे आहे. ते येथून निवडणूक लढवतील, अशी आशा आहे. राहुल गांधी यांनीही केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणात पक्षाच्या दारुण पराभवाबाबत काँग्रेस नेते म्हणाले की, हे वास्तवापासून दूर आहे. ते म्हणाले की, "देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याने संविधान धोक्यात आले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. 400 पार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी आहे. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, मात्र तरुण रोजगार आणि शेतकरी एमएसपीचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दहा वर्षांच्या अन्यायाला जनता कंटाळली आहे."

अलीकडच्या काळात अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसविरोधातही जोरदार वक्तव्य केले आहे. याबाबतच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडला आणि आता निष्ठेचा दाखला देण्यासाठी ते काँग्रेसविरोधात बोलत आहेत. जुन्या साथीदारांनी पक्ष सोडल्याने मन दु:खी झाले आहे, पण मनोधैर्य खचले नाही." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसamethi-pcअमेठीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी