शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:11 IST

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे. मात्र, अजूनही काही जागा अशा आहेत की, जिथे पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशातील या दोन जागा एकेकाळी गांधी घराण्याच्या बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपाने विजय मिळवला. येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती, जिथून ते जिंकले होते. त्याचवेळी सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या, पण आता त्या राज्यसभा सदस्य आहेत. अशा स्थितीत दोन्ही जागा आता गांधी घराण्याच्या हातात राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच यावेळी या दोन जागांवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

जयराम रमेश यांना विचारण्यात आले की, अमेठी-रायबरेली मतदारसंघातून उमेदवार कोण? याला उत्तर देताना ते म्हणाले की, उमेदवारांबाबत काँग्रेस निवडणूक समिती (सीईसी) निर्णय घेईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी अमेठी-रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस संघटनेलाही तेच हवे आहे. ते येथून निवडणूक लढवतील, अशी आशा आहे. राहुल गांधी यांनीही केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणात पक्षाच्या दारुण पराभवाबाबत काँग्रेस नेते म्हणाले की, हे वास्तवापासून दूर आहे. ते म्हणाले की, "देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याने संविधान धोक्यात आले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. 400 पार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी आहे. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, मात्र तरुण रोजगार आणि शेतकरी एमएसपीचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दहा वर्षांच्या अन्यायाला जनता कंटाळली आहे."

अलीकडच्या काळात अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसविरोधातही जोरदार वक्तव्य केले आहे. याबाबतच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडला आणि आता निष्ठेचा दाखला देण्यासाठी ते काँग्रेसविरोधात बोलत आहेत. जुन्या साथीदारांनी पक्ष सोडल्याने मन दु:खी झाले आहे, पण मनोधैर्य खचले नाही." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसamethi-pcअमेठीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी