शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:11 IST

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे. मात्र, अजूनही काही जागा अशा आहेत की, जिथे पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशातील या दोन जागा एकेकाळी गांधी घराण्याच्या बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपाने विजय मिळवला. येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती, जिथून ते जिंकले होते. त्याचवेळी सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या, पण आता त्या राज्यसभा सदस्य आहेत. अशा स्थितीत दोन्ही जागा आता गांधी घराण्याच्या हातात राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच यावेळी या दोन जागांवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे नेते रमेश यांना अमेठी-रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांबद्दल विचारले असता, त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

जयराम रमेश यांना विचारण्यात आले की, अमेठी-रायबरेली मतदारसंघातून उमेदवार कोण? याला उत्तर देताना ते म्हणाले की, उमेदवारांबाबत काँग्रेस निवडणूक समिती (सीईसी) निर्णय घेईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी अमेठी-रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस संघटनेलाही तेच हवे आहे. ते येथून निवडणूक लढवतील, अशी आशा आहे. राहुल गांधी यांनीही केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणात पक्षाच्या दारुण पराभवाबाबत काँग्रेस नेते म्हणाले की, हे वास्तवापासून दूर आहे. ते म्हणाले की, "देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याने संविधान धोक्यात आले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. 400 पार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी आहे. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, मात्र तरुण रोजगार आणि शेतकरी एमएसपीचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दहा वर्षांच्या अन्यायाला जनता कंटाळली आहे."

अलीकडच्या काळात अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसविरोधातही जोरदार वक्तव्य केले आहे. याबाबतच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडला आणि आता निष्ठेचा दाखला देण्यासाठी ते काँग्रेसविरोधात बोलत आहेत. जुन्या साथीदारांनी पक्ष सोडल्याने मन दु:खी झाले आहे, पण मनोधैर्य खचले नाही." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसamethi-pcअमेठीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी