शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभा २०२४ साठी मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 18:10 IST

काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकांसाठी कामाला लागले आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवून भाजपाने लोकसभेची सेमी फायनल जिंकली. अशातच काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. दरम्यान, पंजाबकाँग्रेसने आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांच्यासोबत पक्षाचे नेते राजा वाडिंग यांच्या चंदीगड येथील घरी बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. आगामी लोकसभेसाठी आघाडीसोबत जाण्यास आपण तयार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी हरीश चौधरी यांच्या कानावर घातले. 

काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या रणनीतीवर चर्चा केली. काँग्रेस राज्यातील सर्व १३ जागा स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या बैठकीत राजा वाडिंग यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा, सुखजिंदर रंधवा, परगट सिंग यांचीही उपस्थिती होती. खरं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता असून 'आप' इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. 

काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार पंजाबमधील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी आम्हाला पंजाबमध्ये कोणत्याही आघाडीची गरज नसल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीत असून स्वबळावर आम्ही मैदानात उतरू. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सरकारशी लढण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये आमची कोणावरही विश्वासार्हता नाही आणि आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आल्याचे पंजाब काँग्रेसच्या प्रभारींनी सांगितले.

तेलंगणा वगळता काँग्रेसच्या हाती निराशापाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती, मात्र तेथील जनतेने आपली परंपरा कायम राखत अपेक्षेप्रमाणे सत्ताबदल केला आणि सत्तेच्या चाव्या भाजपाकडे सोपवल्या. मात्र, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजपाला सत्ता कायम राखण्यात यश आले. छत्तीसगडच्या निकालाने मात्र राजकीय पंडितांना देखील धक्का दिला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. पण, तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआर यांच्या पक्षाचा पराभव करत सत्ता काबीज केली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPunjabपंजाबcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी