शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 20:42 IST

Lok Sabha Election 2024: अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या (Congress) तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर देताना दिसत आहे. मात्र प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचं भविष्य आणि सुधारणेसाठीच्या संभाव्य मार्गांबाबत विचारण्यात आले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जेव्हा आपल्यामध्ये काही तरी उणीव आहे आणि सुधारणेची गरज आहे, अशी जेव्हा एखाद्याला जाणीव होते, तेव्हाच सुधारणा होऊ शकते. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये मानसिक अज्ञान, बौद्धिक आळ आणि अहंकार भरलेला आहे. तसेच पक्ष अजूनही याच पद्धतीने मार्गाक्रमण करत आहे. 

याबाबत सविस्तरपणे बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, हे असं आहे की, आपण योग्य मार्गावर आहोत, असं एखाद्याला वाटतं, मात्र ते काय करत आहेत हेच त्यांना बऱ्याचदा समजत नाही. काँग्रेसच्या सद्यस्थितीमागे आणखी एक शक्यता आहे ती म्हणजे भारतीय राजकारणात सध्या काय चाललंय आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करण्याची आवश्यक आहे, हेच त्यांना माहिती नाही आहे, असं परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं. 

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये अज्ञानता, आळस आणि अहंकार यांचं एकत्रिकरण झालं आहे.  लोक त्यांना मत का देत नाही आहेत, हेच काँग्रेसला कळत नाही आहे. दुसरी बाब म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला हे समजत आहे मात्र ते एवढे आळशी आहेत की ते सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर तिसरी बाब म्हणजे काँग्रेसमधील अहंकार असू शकतो. त्यामुळे लोक सध्या आपल्याला मतदान करत नसतील, तरी कधी ना कधी लोकांना आपल्या चुकीची जाणीव होईल आणि शेवटी ते काँग्रेसला मतदान करतील, असं काँग्रेसला वाटत आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर