शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 20:42 IST

Lok Sabha Election 2024: अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या (Congress) तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर देताना दिसत आहे. मात्र प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचं भविष्य आणि सुधारणेसाठीच्या संभाव्य मार्गांबाबत विचारण्यात आले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जेव्हा आपल्यामध्ये काही तरी उणीव आहे आणि सुधारणेची गरज आहे, अशी जेव्हा एखाद्याला जाणीव होते, तेव्हाच सुधारणा होऊ शकते. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये मानसिक अज्ञान, बौद्धिक आळ आणि अहंकार भरलेला आहे. तसेच पक्ष अजूनही याच पद्धतीने मार्गाक्रमण करत आहे. 

याबाबत सविस्तरपणे बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, हे असं आहे की, आपण योग्य मार्गावर आहोत, असं एखाद्याला वाटतं, मात्र ते काय करत आहेत हेच त्यांना बऱ्याचदा समजत नाही. काँग्रेसच्या सद्यस्थितीमागे आणखी एक शक्यता आहे ती म्हणजे भारतीय राजकारणात सध्या काय चाललंय आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करण्याची आवश्यक आहे, हेच त्यांना माहिती नाही आहे, असं परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं. 

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये अज्ञानता, आळस आणि अहंकार यांचं एकत्रिकरण झालं आहे.  लोक त्यांना मत का देत नाही आहेत, हेच काँग्रेसला कळत नाही आहे. दुसरी बाब म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला हे समजत आहे मात्र ते एवढे आळशी आहेत की ते सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर तिसरी बाब म्हणजे काँग्रेसमधील अहंकार असू शकतो. त्यामुळे लोक सध्या आपल्याला मतदान करत नसतील, तरी कधी ना कधी लोकांना आपल्या चुकीची जाणीव होईल आणि शेवटी ते काँग्रेसला मतदान करतील, असं काँग्रेसला वाटत आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर