शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 17:43 IST

Shashi Tharoor : सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे.

Lok Sabha Election 2024 : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. तिसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीत NDA आणि I.N.D.I.A आघाडी यांच्यात थेट लढत आहे. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. उत्तर प्रदेशसारख्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात भाजपची पकड मजबूत असली तरी त्यांच्यासमोर समाजवादी पार्टीचे आव्हान आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार शशी थरूर यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत एक मोठा दावा केला आहे. आता जरी काही संभ्रम असला तरी निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

विरोधी पक्ष आताच्या घडीला एकत्र प्रचार करत असतील किंवा एकमेकांच्या विरोधात... पण लोकसभा निवडणुकीनंतर ते सर्वजण एकत्र येतील. एकमेकांशी हातमिळवणी करून इंडिया आघाडीत काम करतील. त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेला असा पंतप्रधान मिळेल जो सामान्य लोकांसाठी काम करणारा असेल आणि इंडिया आघाडीच्या नेतृत्वातील सरकार इतरांना विश्वासात घेऊन काम करेल, असे शशी थरूर यांनी म्हटले. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

इंडिया आघाडीचे सरकार कसे असेल?थरूर म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर प्रथमच मोठ्या कालावधीनंतर असा पंतप्रधान मिळेल, जो सामान्य लोकांसाठी काम करणारा असेल. त्यांना प्राधान्य देईल, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले जातील. यासाठी एक चांगला व्यवस्थापक असावा लागतो. आमच्या सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला काँग्रेस नेते उपस्थित राहिले नाहीत ते योग्यच होते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोदींची कार्यशैली, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि भाजपच्या कारभाराची शैली पाहता हे सरकार बदलल्यावर मागील दहा वर्षात जे झाले त्याहून काही तरी नक्कीच वेगळे होईल असा मला विश्वास आहे. 

तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे बहुमत नव्हते, त्यांच्या सरकारमध्ये २६ पक्षांचा समावेश होता. परंतु त्यांचे सरकार प्रभावी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले. केरळमधील काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या स्थिती महत्त्वाची ठरते. युती अनेकदा निवडणुकीनंतर होते. लोकसभा निवडणुकीचा ४ जून रोजी जेव्हा निकाल जाहीर होईल. तेव्हा भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र येतील, असेही शशी थरूर यांनी सांगितले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस