शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:44 IST

Loksabha Election - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांच्या झटापटीला हिंसक वळण लागलं आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झटापटीत एका भाजपा महिला कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय ७ भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. ही घटना २२ मे च्या रात्री नंदीग्रामच्या सोनचूरा भागात घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्राने भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.

या हिंसक घटनेत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानं भाजपाही आक्रमक झाली आहे. या घटनेविरोधात नंदीग्राम इथं भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपा कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्त्यावर फेकली. नंदीग्राम येथील अल्पसंख्याक बहुल भागात मतदानाच्या दिवशी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावं अशी मागणी भाजपानं केली. तर संबंधित हिसाचाराच्या घटनेतील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना दिले.

या घटनेचं गांभीर्य पाहता केंद्रीय सुरक्षा दलाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. घटनेत सोनचूरा भागातील एका दुकानाला आग लावण्यात आली. त्याशिवाय अनेक दुकानांची तोडफोड झाली. टीएमसी समर्थकाचे दुकाने जाळल्याचा भाजपावर आरोप आहे. या घटनेनंतर भाजपा नेते शुभेंद्रु अधिकारी यांनी म्हटलं की, टीएमसीनं एससी समुदायातील ५६ वर्षीय महिलेची हत्या केली. तिच्या मुलालाही मारले. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मतदानाच्या दिवशीही असाच प्रकार घडण्याची शक्यता पाहता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करावेत असं त्यांनी मागणी केली. 

तर भाजपाची अंतर्गत लढाई असून त्यातूनच एका महिलेला मारण्यात आलं. त्यानंतर त्याचा आरोप टीएमसीवर लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होतोय त्यासाठी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत असा पलटवार टीएमसी नेते सांतनु सेन यांनी भाजपावर केला. नंदीग्राममधील हिंसाचार हा टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या चिथावणीखोर विधानामुळे झाला असा आरोप भाजपाने केला आहे. 

२००७ मध्ये झाला होता १४ जणांचा मृत्यू

नंदीग्राम येथे १४ मार्च २००७ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी वाममोर्चा सरकारने विशेष कायद्यानुसार जमीन अधिग्रहण केले जात होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. त्या विरोधात ममता बॅनर्जी पुढे होत्या. या मोर्चानं हिंसक वळण घेताच पोलिसांनी गोळीबार केला. त्यात १४ मृत्यूमुखी पडले. या घटनेचा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला आणि त्यांनी हळूहळू सत्तेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी