शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:44 IST

Loksabha Election - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांच्या झटापटीला हिंसक वळण लागलं आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झटापटीत एका भाजपा महिला कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय ७ भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. ही घटना २२ मे च्या रात्री नंदीग्रामच्या सोनचूरा भागात घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्राने भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.

या हिंसक घटनेत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानं भाजपाही आक्रमक झाली आहे. या घटनेविरोधात नंदीग्राम इथं भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपा कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्त्यावर फेकली. नंदीग्राम येथील अल्पसंख्याक बहुल भागात मतदानाच्या दिवशी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावं अशी मागणी भाजपानं केली. तर संबंधित हिसाचाराच्या घटनेतील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना दिले.

या घटनेचं गांभीर्य पाहता केंद्रीय सुरक्षा दलाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. घटनेत सोनचूरा भागातील एका दुकानाला आग लावण्यात आली. त्याशिवाय अनेक दुकानांची तोडफोड झाली. टीएमसी समर्थकाचे दुकाने जाळल्याचा भाजपावर आरोप आहे. या घटनेनंतर भाजपा नेते शुभेंद्रु अधिकारी यांनी म्हटलं की, टीएमसीनं एससी समुदायातील ५६ वर्षीय महिलेची हत्या केली. तिच्या मुलालाही मारले. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मतदानाच्या दिवशीही असाच प्रकार घडण्याची शक्यता पाहता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करावेत असं त्यांनी मागणी केली. 

तर भाजपाची अंतर्गत लढाई असून त्यातूनच एका महिलेला मारण्यात आलं. त्यानंतर त्याचा आरोप टीएमसीवर लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होतोय त्यासाठी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत असा पलटवार टीएमसी नेते सांतनु सेन यांनी भाजपावर केला. नंदीग्राममधील हिंसाचार हा टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या चिथावणीखोर विधानामुळे झाला असा आरोप भाजपाने केला आहे. 

२००७ मध्ये झाला होता १४ जणांचा मृत्यू

नंदीग्राम येथे १४ मार्च २००७ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी वाममोर्चा सरकारने विशेष कायद्यानुसार जमीन अधिग्रहण केले जात होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. त्या विरोधात ममता बॅनर्जी पुढे होत्या. या मोर्चानं हिंसक वळण घेताच पोलिसांनी गोळीबार केला. त्यात १४ मृत्यूमुखी पडले. या घटनेचा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला आणि त्यांनी हळूहळू सत्तेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी