शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:44 IST

Loksabha Election - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांच्या झटापटीला हिंसक वळण लागलं आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झटापटीत एका भाजपा महिला कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय ७ भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. ही घटना २२ मे च्या रात्री नंदीग्रामच्या सोनचूरा भागात घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्राने भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.

या हिंसक घटनेत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानं भाजपाही आक्रमक झाली आहे. या घटनेविरोधात नंदीग्राम इथं भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपा कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्त्यावर फेकली. नंदीग्राम येथील अल्पसंख्याक बहुल भागात मतदानाच्या दिवशी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावं अशी मागणी भाजपानं केली. तर संबंधित हिसाचाराच्या घटनेतील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना दिले.

या घटनेचं गांभीर्य पाहता केंद्रीय सुरक्षा दलाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. घटनेत सोनचूरा भागातील एका दुकानाला आग लावण्यात आली. त्याशिवाय अनेक दुकानांची तोडफोड झाली. टीएमसी समर्थकाचे दुकाने जाळल्याचा भाजपावर आरोप आहे. या घटनेनंतर भाजपा नेते शुभेंद्रु अधिकारी यांनी म्हटलं की, टीएमसीनं एससी समुदायातील ५६ वर्षीय महिलेची हत्या केली. तिच्या मुलालाही मारले. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मतदानाच्या दिवशीही असाच प्रकार घडण्याची शक्यता पाहता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करावेत असं त्यांनी मागणी केली. 

तर भाजपाची अंतर्गत लढाई असून त्यातूनच एका महिलेला मारण्यात आलं. त्यानंतर त्याचा आरोप टीएमसीवर लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होतोय त्यासाठी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत असा पलटवार टीएमसी नेते सांतनु सेन यांनी भाजपावर केला. नंदीग्राममधील हिंसाचार हा टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या चिथावणीखोर विधानामुळे झाला असा आरोप भाजपाने केला आहे. 

२००७ मध्ये झाला होता १४ जणांचा मृत्यू

नंदीग्राम येथे १४ मार्च २००७ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी वाममोर्चा सरकारने विशेष कायद्यानुसार जमीन अधिग्रहण केले जात होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. त्या विरोधात ममता बॅनर्जी पुढे होत्या. या मोर्चानं हिंसक वळण घेताच पोलिसांनी गोळीबार केला. त्यात १४ मृत्यूमुखी पडले. या घटनेचा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला आणि त्यांनी हळूहळू सत्तेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी