शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:21 IST

Lok Sabha Election 2024: "संदेशखलीतील आरोपीला तृणमूलने वाचवण्याचा प्रयत्न केला. बंगालमध्ये टीएमसी सरकार रामाचे नावही घेऊ देत नाही."

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज(12 मे 2024) पश्चिम बंगालमधील (West Bengal) च्या बराकपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी टीएमसी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, CAA, राम मंदिर आणि आरक्षणाबाबत राज्यातील जनतेला 5 गॅरंटी दिल्या. 

आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, "आपला महान भारत देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हाती देता येईल का? मित्रांनो, टीएमसी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी तुष्टीकरणाचे राजकरण करते. येथील तृणमूल आमदाराने हिंदूंना भागीरथीमध्ये बुडवू, असे म्हटले होते. कुणाच्या जीवावर ते एवढी हिंमत करतात? यांनी बंगालमध्ये हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले. तुष्टीकरणासाठी ते एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताहेत." 

संदेशखलीचा मुद्दा..."संदेशखलीतील आरोपीला तृणमूल काँग्रेसने वाचवण्याचा प्रयत्न केला. टीएमसीचे गुंड संदेशखलीतील माता-बहिणींना धमकावत आहेत. कारण काय, तर अत्याचार करणाऱ्याचे नाव शहाजहान शेख आहे. आज परिस्थिती अशी आहे की, बंगालमध्ये टीएमसी सरकार रामाचे नावही घेऊ देत नाही. सरकार रामनवमी साजरी करण्यास परवानगी देत ​​नाही. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या लोकांनीही राम मंदिराविरोधात आघाडी उघडली आहे, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. तसेच, राज्यातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या.

पीएम मोदींच्या पाच गॅरंटी

  1. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही."
  2. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत कोणीही CAA रद्द करू शकणार नाही."
  3. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तुम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही."
  4. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोणीही रद्द करू शकत नाही."
  5. "जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि OBC यांचे आरक्षण संपणार नाही."

काँग्रेसवर जोरदार टीकायावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस कुटुंबाने 50 वर्षे सरकारे चालवले, परंतु काँग्रेसच्या राजवटीत पूर्व भारतात फक्त गरिबीत होता. बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश..काँग्रेस आणि इंडियातील पक्षांनी पूर्व भारताला मागास सोडले. 2014 मध्ये आम्हाला संधी दिली अन् आम्ही देशाच्या पूर्व भागाला विकसित भारताचे ग्रोथ इंजिन बनवले," अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका