शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा करणार मोठी खेळी, २०१९ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:36 IST

Lok sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, २०१९ च्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करू शकतो. भाजपा आपल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नावांचा समावेश करू शकतो.  

२०१९ मध्येही भाजपाने आपल्या पहिल्या यादीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांची उमेदवारी जाहीर केली होती. भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये पक्षाने आतापर्यंत कधीही  न जिंकलेल्या आणि २०१९ मध्ये अत्यंत कमी फरकाने जिंकलेल्या १६४ जागांचाही समावेश असेल. गेल्या दोन वर्षांपासून भाजपाकडून अशा जागांवर लक्ष्य केंद्रित करून मेहनत घेतली जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ५४३ पैकी ४३६ जागांवर निवडणूक लढवली होती. तसेत त्यापैकी ३०३ जागांवर विजय मिळवला होता. तर १३३ जागांवर भाजपाचा पराभव झाला होता. त्याबरोबरच पक्ष कमकुवत असलेल्या ३१ जागा अशा मिळून १६४ जागांची यादी करून केंद्रीय मंत्री आणि इतर बड्या नेत्यांकडे या जागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी घेतलेल्या नेत्यांमध्ये अमित शाह यांचाही समावेश आहे.

भाजपाने या जागांना सी आणि डी गटात विभागलं आहे. त्यात प्रत्येकी ८० जागांच्या दोन श्रेणी बनवण्यात आल्या आहेत. ४५ मंत्र्यांकडे या जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक मंत्र्याकडे दोन किंवा तीन जागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये काही बड्या मित्रपक्षांनी भाजपाची सोडलेली साथ हे  त्यामागचं महत्त्वाचं कारणं  आहे.

भाजपा २०१९ मध्ये पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक या पक्षांना सोबत घेऊन लढला होता. मात्र आता या मित्रपक्षांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यामुळे या राज्यांत भाजपाला अधिकाधिक जागा लढता येतील. २०१९ मध्ये भाजपाने पंजाबमधील १३ पैकी ३, महाराष्ट्रात ४८ पैकी २५, बिहारमध्ये ४० पैकी १७ तर तामिळनाडूमध्ये ३९ पैकी ५ जागांवर निवडणूक लढवली होती. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक