शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 07:27 IST

अशा समीकरणाकडून देशाच्या भल्याची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही, असे ते येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले.

कटक : सत्तेत आल्यास विरोधी आघाडीत सहभागी पक्षांना एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपद देण्याचे समीकरण ‘इंडिया’ आघाडीने आणले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. अशा समीकरणाकडून देशाच्या भल्याची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही, असे ते येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले.

‘इंडिया आघाडीने एक नवे समीकरण आणल्याचे मी ऐकले आहे... त्यांनी (इंडिया आघाडी) सर्व भागीदारांना खुश करण्यासाठी सत्तावाटपाचे समीकरण आणले आहे. जर त्यांना पाच वर्षांसाठी (राज्य करण्याची) संधी मिळाली, तर प्रत्येकाला एक वर्षासाठी पंतप्रधानपद मिळेल, असे त्यांनी आपल्या आघाडीतील भागीदारांना सांगितले आहे. जर देश कोणाच्या हाती सोपवायचा आहे तर आम्ही सोपवण्यापूर्वी विचार करू की नाही? तुम्ही कोणाच्याही हाती देश सोपवणार का? संबंधित व्यक्ती देश सांभाळण्यास सक्षम आहे किंवा नाही हे आम्ही पाहणार ही नाही? तुमच्याकडे असे कोण आहे ज्याच्या खांद्यावर लोक देशाची जबाबदारी साेपवू शकतात? एखादे नाव आहे का?, असे सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केले.

राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता त्यांना जनता नाकारेल

सिरसी (कर्नाटक) : राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी येथे काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्यांनी नाकारले, त्यांना लोकसभा निवडणुकीत जनता नाकारेल, असे ते म्हणाले. खरेतर देश स्वतंत्र झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी राममंदिर उभारणीचा निर्णय व्हायला हवा होता. असे माेदी म्हणाले.

‘ते नवाब, निजामांबाबत बोलत नाहीत’ : राहुल यांच्यावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप करताना मोदी बेळगावमध्ये म्हणाले की, त्यांनी भारतातील राजे, महाराजांचा अपमान केला. मात्र, नवाब, निजाम, सुलतान व बादशहांनी केलेल्या अत्याचारांबाबत चकार शब्द काढला नाही. हे त्यांचे तुष्टीकरणाचे राजकारण आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूक