शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 12:06 IST

Akhilesh Yadav And BJP : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला.

उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या दहा जागांवर मतदान होत आहे. यावेळी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. याच दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीमध्ये मतदान केलं आहे.

मतदान केल्यानंतर अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात. उन्हाळ्यात होणारे मतदान महिनाभर अगोदर होऊ शकतं. यावेळी त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं. हे मतच आमचं आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. 

"मी सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतो. या मतामुळे संविधान मजबूत होईल. जितकी जास्त मतं पडतील तितका लोकशाहीवरचा विश्वास वाढेल. हे मत जीवनात बदल घडवून आणतं. भाजपा सरकारमध्ये घोटाळा, फसवणूक आणि खोटेपणा याची गॅरेंटी आहे."

"ना शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, ना रोजगार आहे, परीक्षे आधीच पेपर फुटतात. भाजपाला काही लोकांना नफा मिळवून द्यायचा आहे म्हणूनही महागाई आहे. सरकार बळाचा वापर करत असल्याची माहिती काही ठिकाणाहून येत आहे. मी स्वतः गाडीतून खाली उतरलो तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला भानच नव्हतं" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. 

मैनपुरीच्या विद्यमान खासदार आणि सपाच्या उमेदवार डिंपल यादव म्हणाल्या की, "बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. भाजपामध्ये धोरण आणि हेतूचा अभाव आहे. आज देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी निवडणूक आहे. राजकीय विचारसरणीचा हा लढा आहे." 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाVotingमतदान