शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

जाणून घ्या, मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या 'अमीट शाई'विषयक रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:23 IST

निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यांतील निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नामनिर्देशन सादर केले आहे. निवडणूक म्हणजे दर पाच वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सवच. या निवडणुकीत एक गोष्ट फार महत्त्वाची असते. ती म्हणजे मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई. या शाईविषयी अनेक गंमतीदार गोष्टी आहोत.

भारत स्वातंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा १९५१-५२ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत नव्हती. परंतु, निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.

शाईसाठी घेतली 'एनपीएल'ची मदत

शाई तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यावेळी नॅशनल फिजीकल लॅबोरटरी ऑफ इंडियाला (एनपीएल) एक विशिष्ट प्रकारची शाई बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच ती शाई पाण्याने किंवा कुठल्याही केमिकलने धुतली जाऊ नये, अशा सुचना केल्या होत्या. त्यानंतर एनपीएलने म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीला तशी शाई बनविण्याची ऑर्डर दिली होती.

शाईचा पहिल्यांदा वापर

१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमिट शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. तेव्हापासून ही शाई प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येते. मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्याचा अर्थ असा होतो की, मतदाराने आधी मतदान केले आहे. बोटाला लावलेली ही शाई तब्बल १५ दिवस पुसली जात नाही, हे विशेष.

उन्हात आणखीनच घट्ट होते शाई

निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या शाईचा फॉर्म्युला एनपीएल आणि म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीने गुप्त ठेवला आहे. याचा फॉर्म्युला जाहीर केल्यास ती मिटविण्यासाठी लोक नवीन फॉर्म्युला शोधून काढतील, अशी शका निवडणूक आयोगाला आहे. जाणकारांच्या मते या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळलेले असते. त्यामुळे उन्हात येताच ही शाई आणखी घट्ट होते.

अनेक देशांमध्ये या शाईचा वापर

जगभरात तब्बल २८ देशांमध्ये अमिट शाईचा वापर करण्यात येतो. यामध्ये तुर्की, नायजेरीया, अफगानिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना, कॅनडा, मलेशिया, मालदीव आणि कंबोडीया यासारख्या अनेक देशांचा समावेश आहे. कंबोडीया आणि मालदीवमध्ये मतदान केल्यानंतर मतदाराचे बोटच शाईमध्ये बुडविण्यात येते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकIndiaभारत