शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'यामुळे' अडवाणींनी नाकारली मुलीसाठीची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:17 IST

बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात असून विद्यमान खासदारांवर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्यात आला आहे. परंतु, भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे गांधीनगर मतदार संघातून तिकीट कापल्याची सगळीकडे चर्चा आहे. आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह गांधीनगर येथून उमेदवार बदलण्यासाठी इच्छूक होते. भाजप नेतृत्व ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी सकारात्मक नव्हते. परंतु, भाजपचे संस्थापक सदस्य असलेले अडवाणी यांना हटविणे एवढे सोपे नव्हते. अडवाणी यांना बाजुला करण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी प्रयत्न केले होते. त्यांनी अनेकदा अडवाणी यांच्याकडे निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु अडवाणी यांनी स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. मात्र बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

दरम्यान अडवाणी यांच्याकडे निवडणूक न लढविण्याचा आणि आपल्या पसंतीचा उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच प्रस्तावात अडवाणी यांच्या मुलीला उमेदवारी देण्याचे देखील ठरले होते. परंतु, अडवाणी यांनी याला स्पष्ट नकार देत आपण आयुष्यभर घराणेशाहीचा विरोध केल्याचे म्हटले. तसेच सर्वांचे मत घेत निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपा