शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

रमजानच्या महिन्यात मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजता सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 18:17 IST

मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान आणि इतर राज्यातील अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्लीम समाजातून होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळातच मुस्लीम समाजाचा रमजानचा महिना सुरू होत आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लीम समाजातील व्यक्तींना उपवास असतात. उपवास असताना उन्हात घरा बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे, उरलेल्या तीन टप्प्यांमधील मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.

मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजात उपवास ठेवण्याची प्रथा आहे. याशिवाय, मे महिन्यामुळे तीव्र उन्हाळा असणार आहे. राजस्थान आणि इतर राज्यातील अतिउष्मा असणाऱ्या ठिकाणीही मतदान प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्लीम समाजातून होत आहे. याविषयी, मुस्लीम समाजाच्य वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. उन्हाचा पारा लक्षात घेत दुपारच्या वेळी घर बाहेर पडणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे, मतदानाच्या वेळात बदल करावा अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने केली जात आहे.

यासंदर्भातही निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. आता या याचिकांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकMuslimमुस्लीमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRamadanरमजान