शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 14:37 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी पद भरण्यासंदर्भात आणखी एक घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकरीसाठी भरण्यात येणारे परीक्षा शुल्क रद्द करणार असल्याचे म्हटले. याचा लाभ स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी आपापला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात गरिब आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. तर भाजपने मध्यमवर्गीयांना केंद्रबिंदू ठेवले असून राष्ट्रवादावर अधिक भर दिला आहे. काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता आणखी एक घोषणा केली आहे. ही घोषणा स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा दावा काँग्रेससह विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशभरात रिक्त असलेले लाखो सरकारी पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपने रिक्त असलेले सरकारी पदे भरण्यासंदर्भात काहीही म्हटले नाही.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी पद भरण्यासंदर्भात आणखी एक घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकरीसाठी भरण्यात येणारे परीक्षा शुल्क रद्द करणार असल्याचे म्हटले आहे. याचा लाभ स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

देशात आणि राज्यात अनेक तरुण स्पर्धा परिक्षांची तयारी करतात. अनेकदा जागा कमी निघतात, त्यामुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते. परंतु, नोकरीसाठी आधीच मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते. नोकरी मिळाली नाही, की भरलेली रक्कम देखील तशीच जाते. काँग्रेस अध्यक्षांनी ही गोष्ट लक्षात घेत पदभरतीसोबतच तरुणांना अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काची देखील काळजी घेतली आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस