शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : आणि रेहान वाड्रा याची पहिल्यांदा मतदान करण्याची संधी हुकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:07 IST

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. 

ठळक मुद्देयूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता.  पत्रकारांनी रविवारी यासंदर्भात प्रियंका गांधी यांना रेहानने मतदान का केले नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 'रेहानची परीक्षा सुरू असून त्यासाठी तो लंडनला गेला आहे' असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं.'

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या मनेका गांधी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंदिया, शीला दीक्षित, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव अशा अनेक बड्या उमेदवारांचे भवितव्य लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानात रविवारी (13 मे) ईव्हीएमबंद झाले. सात राज्यांत 59 लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी 63.3 टक्के इतके मतदान झाले.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा  (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. 

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया उपस्थित होते. तसेच यावर्षी रेहान पहिल्यांदाच मतदान करणार होता. मात्र त्याने मतदान केले नाही. पत्रकारांनी रविवारी यासंदर्भात प्रियंका गांधी यांना रेहानने मतदान का केले नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 'रेहानची परीक्षा सुरू असून त्यासाठी तो लंडनला गेला आहे' असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं.' परीक्षेमुळे मतदान करता आलं नसल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. 

सध्या सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी रविवारी दिली. प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील लोढी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''यंदाची लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि देशाला वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मतदान करताना ही बाब लक्षात ठेवा.  या निवडणुकीदम्यान देशातील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत होता. त्यामुळे भाजपाचा पराभव होणार हे स्पष्ट आहे.'' असे प्रियंका गांधी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिलेल्या आश्वासनांबाबत काहीच बोलत नाही. दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन याबाबत बोलण्याऐवजी नरेंद्र मोदी हे वायफळ विषयांवर बोलत आहेत. असा टोलाही प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला. 

सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात 63% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के

सात राज्यांत 59 लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी 63.3 टक्के इतके मतदान झाले. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व भाजपामधील कडव्या संघर्षामुळे गाजत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.13 टक्के मतदान झाले. परंतु या राज्यात तुरळक हिंसाचाराचे गालबोट लागले. पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यावर ताफ्यावर हल्ला झाला. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. या घटनेत घोष यांचा एक अंगरक्षक जखमी झाला व ताफ्यातील एका वाहनाची नासधूस झाली आहे. यावेळी घोष यांच्याबरोबर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचा एक जण जखमी झाला आहे. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपा आणि आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या वेशात येत आहेत, असा आरोप केला.बिहारमधील शेओहर लोकसभा मतदारसंघात होमगार्डच्या बंदूकीतून चुकून उडालेली गोळी लागून एक निवडणूक कर्मचारी ठार झाला. बिहारच्या पश्चिम चंपारण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय जयस्वाल यांनाही काही जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचे समजते. हरयाणामध्ये जिंद जिल्ह्यात तीन बूथवरील ईव्हीएम यंत्रांवर आपले निवडणूक चिन्ह नीट दिसत नसल्याची तक्रार जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्विजय चौटाला यांनी केली. अन्य राज्यांतही काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आहेत. या 59 मतदारसंघातील सर्वाधिक 43 जागा भाजपाकडे होत्या. या जागा राखणे हे भाजपापुढे मोठे आव्हान असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस