शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:21 IST

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता एक दिवस शिल्लक आहे. निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यामुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक जरी संभ्रमात असले तरी काँग्रेसला मात्र २००४ लोकसभा निवडणूक निकालाच्या पुनरावृत्तीची आशा आहे. २००४ मध्ये काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल. आता एक्झिट पोल आल्यानंतर देखील काँग्रेसनुसार भाजप २०० च्या आतच राहिल. तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजपला एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात येत असलेल्या जागा मिळणे कठिण आहे. तसेच ज्या राज्यात २०१४ मध्ये भाजप आघाडीवर होते, तिथे भाजपला नुकसान होणे निश्चित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा करण्यात आलेला दावा काँग्रेसनेच नव्हे तर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने देखील फेटाळला आहे. सपाचे महासचिव रामगोपाल यादव म्हणाले की, २३ मे रोजी सर्व एक्झिट पोल कोसळणार आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्या सतीश चंद मिश्रा यांनी एक्झिट पोलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आपला एक्झिट दाखवून विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. नायडू यांच्यानुसार काँग्रेसला १२९ आणि भाजपला १७९ जागा मिळतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी