शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 11:17 IST

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे.

मुंबई - यंदाची लोकसभा निवडणूककाँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीप्रमाणेच सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मात्र राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सोनिया यांनी भाजपसह मोदींना निर्वाणीचा इशारा देताना २००४ विसरू नये, असा टोला लगावला आहे. त्यामुळे मोदींसाठी ही धोक्याची घंटा तर नव्हे ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे. तसेच २०१४ पेक्षा मोठा विजय भाजप यावेळी मिळणावर असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे मोदींसाठी २०१९ चा मार्ग खडतरच समजला जात आहे.

१९९९ मध्ये देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. अटलजी यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानसोबत कारगील युद्ध झाले होते. तसेच अटलजी यांनी अनुचाचणी देखील घेतली होती. त्यामुळे अटलजी आणि भाजपची लोकप्रियता वाढली होती. भाजपच्या राष्ट्रवादामुळे देशात अटलजी पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील, अशी अंदाज अनेकांनी त्यावेळी केले होते. अटलजींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्याप्रमाणे मोदींची सध्या लोकप्रियता आहे, अगदी त्याचप्रमाणे अटलजी लोकप्रिय होते.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील अखेरच्या टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांने पाकिस्तानला धडा शिकवला. त्यामुळे देशात राष्ट्रवादाची लहर आली आहे. याचा लाभ घेण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या बलिदानावर जनतेला मतं मागण्यास सुरुवात केली आहे. अटलजींच्या काळातही राष्ट्रवादाची लाट होती. परंतु, अटलजींनी सैन्याच्या नावावर मत मागितले नव्हते. तसेच अटलजींची लोकप्रियता पाहता भाजप विजयी होईल, असा अंदाज होता. मात्र २००४ मध्ये काँग्रेसने जबरदस्त 'कमबॅक' करताना एनडीए सरकारला सत्तेवरून खाली खेचले होते.

याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना इतिहासाची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंतप्रधान मोदींनी २००४ विसरू नये, असं सांगत सोनिया यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केली आहे. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या असून ही मोदींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा