शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 11:17 IST

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे.

मुंबई - यंदाची लोकसभा निवडणूककाँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीप्रमाणेच सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मात्र राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सोनिया यांनी भाजपसह मोदींना निर्वाणीचा इशारा देताना २००४ विसरू नये, असा टोला लगावला आहे. त्यामुळे मोदींसाठी ही धोक्याची घंटा तर नव्हे ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे. तसेच २०१४ पेक्षा मोठा विजय भाजप यावेळी मिळणावर असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे मोदींसाठी २०१९ चा मार्ग खडतरच समजला जात आहे.

१९९९ मध्ये देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. अटलजी यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानसोबत कारगील युद्ध झाले होते. तसेच अटलजी यांनी अनुचाचणी देखील घेतली होती. त्यामुळे अटलजी आणि भाजपची लोकप्रियता वाढली होती. भाजपच्या राष्ट्रवादामुळे देशात अटलजी पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील, अशी अंदाज अनेकांनी त्यावेळी केले होते. अटलजींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्याप्रमाणे मोदींची सध्या लोकप्रियता आहे, अगदी त्याचप्रमाणे अटलजी लोकप्रिय होते.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील अखेरच्या टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांने पाकिस्तानला धडा शिकवला. त्यामुळे देशात राष्ट्रवादाची लहर आली आहे. याचा लाभ घेण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या बलिदानावर जनतेला मतं मागण्यास सुरुवात केली आहे. अटलजींच्या काळातही राष्ट्रवादाची लाट होती. परंतु, अटलजींनी सैन्याच्या नावावर मत मागितले नव्हते. तसेच अटलजींची लोकप्रियता पाहता भाजप विजयी होईल, असा अंदाज होता. मात्र २००४ मध्ये काँग्रेसने जबरदस्त 'कमबॅक' करताना एनडीए सरकारला सत्तेवरून खाली खेचले होते.

याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना इतिहासाची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंतप्रधान मोदींनी २००४ विसरू नये, असं सांगत सोनिया यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केली आहे. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या असून ही मोदींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा