शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 11:17 IST

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे.

मुंबई - यंदाची लोकसभा निवडणूककाँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीप्रमाणेच सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मात्र राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सोनिया यांनी भाजपसह मोदींना निर्वाणीचा इशारा देताना २००४ विसरू नये, असा टोला लगावला आहे. त्यामुळे मोदींसाठी ही धोक्याची घंटा तर नव्हे ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे. तसेच २०१४ पेक्षा मोठा विजय भाजप यावेळी मिळणावर असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे मोदींसाठी २०१९ चा मार्ग खडतरच समजला जात आहे.

१९९९ मध्ये देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. अटलजी यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानसोबत कारगील युद्ध झाले होते. तसेच अटलजी यांनी अनुचाचणी देखील घेतली होती. त्यामुळे अटलजी आणि भाजपची लोकप्रियता वाढली होती. भाजपच्या राष्ट्रवादामुळे देशात अटलजी पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील, अशी अंदाज अनेकांनी त्यावेळी केले होते. अटलजींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्याप्रमाणे मोदींची सध्या लोकप्रियता आहे, अगदी त्याचप्रमाणे अटलजी लोकप्रिय होते.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील अखेरच्या टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांने पाकिस्तानला धडा शिकवला. त्यामुळे देशात राष्ट्रवादाची लहर आली आहे. याचा लाभ घेण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या बलिदानावर जनतेला मतं मागण्यास सुरुवात केली आहे. अटलजींच्या काळातही राष्ट्रवादाची लाट होती. परंतु, अटलजींनी सैन्याच्या नावावर मत मागितले नव्हते. तसेच अटलजींची लोकप्रियता पाहता भाजप विजयी होईल, असा अंदाज होता. मात्र २००४ मध्ये काँग्रेसने जबरदस्त 'कमबॅक' करताना एनडीए सरकारला सत्तेवरून खाली खेचले होते.

याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना इतिहासाची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंतप्रधान मोदींनी २००४ विसरू नये, असं सांगत सोनिया यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केली आहे. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या असून ही मोदींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा