शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसच्या वाट्याला; 'आप'च्या मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 17:39 IST

राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला.

नवी दिल्ली - दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम यांनी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते, असा दावा केला आहे. दिल्लीत 'आप'ला मोठे यश मिळेल अशी आशा होती, मात्र गौतम यांच्या दाव्यामुळे ही शक्यता कमी झाल्याचे चित्र आहे.

राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला. गौतम उत्तर-पूर्व दिल्ली विधानसभा मतदार संघातील उमेदवार आहे.

दुसरीकडे 'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतांचे विभाजन टाळले असल्याचे म्हटले. दिल्लीतील मुस्लीम मतदार 'आप'ला एकतर्फी मतदान करती, अशी आशा होती. परंतु, मतदानानंतर मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याला आपच्या मंत्र्यानेच पुष्टी दिली आहे. दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांसाठी रविवारी १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. येथे एकूण ६० टक्के मतदान झाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी 'आप' आणि काँग्रेस यांच्यात युतीसाठी अनेक चर्चा झाल्या. मात्र कधी काँग्रेसकडून तर कधी आपकडून युतीसाठी सकारात्मक चर्चा झाली नाही. त्यामुळे अखेरीस उभय पक्षांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसdelhiदिल्ली