शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

खासदार महाशय मोदी सरकारचं गुणगान गात बसले, हेलिकॉप्टर त्यांना न घेताच उडाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:53 IST

येताना आले झोकात, जाताना लागली 'वाट'!

ठळक मुद्देएक हेलिकॉप्टर धुरळा उडवत निघून गेल्यानं भाजपाच्या खासदार महोदयांची भलतीच पंचाईत झाली. येताना झोकात आलेल्या राजवीर यांचा परतीचा प्रवास खडतर ठरला.कारणीभूत ठरलं, ते त्यांचं लांबलचक भाषण. 

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असल्यानं संध्याकाळी सहानंतर सगळा राजकीय माहौल शांत होईल. पण, निवडणुकीचे अजून तीन टप्पे शिल्लक आहेत आणि त्यात उत्तर प्रदेशचे अनेक मतदारसंघ येतात. स्वाभाविकच, तिथे स्थानिक आणि राष्ट्रीय नेते प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. या धामधुमीतच, एक हेलिकॉप्टर धुरळा उडवत निघून गेल्यानं भाजपाच्या खासदार महोदयांची भलतीच पंचाईत झाली. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे चिरंजीव राजवीर सिंह हे एटा मतदारसंघाचे खासदार आहेत. कौशांबी जिल्ह्यातल्या एका गावात त्यांची सभा होती. भाजपाचे उमेदवार विनोद सोनकर यांच्या प्रचारासाठी ते खास हेलिकॉप्टरने आले होते. परंतु, येताना झोकात आलेल्या राजवीर यांचा परतीचा प्रवास खडतर ठरला. त्याला कारणीभूत ठरलं, ते त्यांचं लांबलचक भाषण. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाच वर्षांत केलेली कामं, त्यांच्या योजना यावर राजवीर सिंह भरभरून बोलले. मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तरंही दिली. किती बोलू आणि किती नको, असंच जणू त्यांना झालं होतं. या उत्साहात हेलिकॉप्टर अडीच वाजता परतीच्या प्रवासासाठी उडणार, हेही ते विसरले. सवा दोनच्या सुमारास पायलटने त्यांना सूचना दिली. परंतु, 'वाइंड अप'च्या इशाऱ्यानंतरही त्यांचं मोदीगान सुरूच होतं. अखेर, खासदार महोदयांना तिथेच सोडून पायलटनं बरोब्बर अडीच वाजता 'टेक ऑफ' केलं आणि हेलिकॉप्टर लखनऊच्या दिशेनं रवाना झालं. त्यामुळे राजवीर सिंह यांना परतीचा प्रवास कारने करावा लागला.

खासदार असो, मंत्री असो वा त्याहून मोठा नेता; हेलिकॉप्टरची वेळ त्यांना पाळावीच लागते. 'एअर ट्रॅफिक कंट्रोल'च्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं. ही वेळ न पाळल्याचाच फटका राजवीर सिंह यांना बसला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019kaushambi-pcकौशंबीBJPभाजपा