शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:26 IST

आम आदमी पक्षाशी आघाडी न करण्याचा काँग्रेसचा निर्णय

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आमचा पक्ष दिल्लीत लोकसभेच्या सर्व सातही जागा स्वबळावर लढवणार असल्याचे व आम आदमी पक्षाशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे सांगून सोमवारी सगळ्या चर्चा व अफवांना पूर्णविराम दिला.काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश अध्यक्ष शीला दीक्षित यांची भूमिका मान्य करून गांधी यांनी स्वत:च्या आणि दिल्ली प्रदेशचे प्रभारी पी. सी. चाको यांच्या सूचनेचा बळी दिला. येथील इंदिरा गांधी इन्डोर स्टेडीयममध्ये ‘मेरा बूथ, मेरा गौरव’ अंतर्गत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही आपापल्या बूथवर जाऊन लोकांना सांगा की देशाचा विकास काँग्रेसच करू शकतो, आप नाही आणि भाजपादेखील. आता बूथ कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी दिल्लीतील सर्व सातही जागांवर काँग्रेस उमेदवारांना विजयी बनवावे.तत्पूर्वी, राहुल यांनी मोदी यांच्यावर टीका करताना पुन्हा म्हटले की, चौकीदार चोर आहे. त्यावर हजारों कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’, असे म्हणत त्यांना प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन सांगावे की, मोदी यांनी जे दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते ते रोजगार कुठे आहेत? अजहर मसूद याला कोणी सोडले, अजित डोवाल यांची मसूदला सोडण्यात काय भूमिका होती? मोदी यांची खिल्ली उडवताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांचे बूट, शर्टस आणि मोबाईलच्या मागे लिहिलेले असते ‘मेड इन चायना’ आणि ते प्रचार करतात ‘मेक इन इंडिया’चा. राहुल यांनी या संमेलनातून देशाला याचे संकेत द्यायचा प्रयत्न केला की काँग्रेस जे बोलेले ते करील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीAam Admi partyआम आदमी पार्टीcongressकाँग्रेसdelhiदिल्ली