शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 17:05 IST

भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजयाची नोंद करताना २०१४ मधील स्वत:ची कामगिरी आणखी उंचावली आहे. यात काँग्रेसची वाताहत झाल्याचे चित्र आहे. भाजप प्रणीत एनडीएने बहुमताकडे आगेकूच केली आहे. तर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे.

भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली. काँग्रेसला केवळ ५५ जागा मिळाल्या. सध्या काँग्रेसच्या मुख्यालयात शांतता पसरली आहे. आधीच एक्झिट पोलने आधीच एनडीएला बहुमत दाखवले होते.

सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देण्यात आलेला 'चौकीदार चोर'चा नारा सपशेल फसल्याचे काँग्रेसकडून मान्य करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसला एवढ्या दारुण पराभवाची कल्पना नव्हती. पक्षाने एकत्र होऊन लढणे आवश्यक होते. तर काँग्रेसला मजबूत स्थितीत आणता आले असते, असंही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

राफेलच्या मुद्दावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले होते. तसेच 'चौकीदार चोर है'चा नारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने 'मै भी चौकीदार'ची मोहिम उभारली होती. मात्र 'चौकीदार चोर'ची काँग्रेसची मोहिम फसली आणि मोदींची 'मै भी चौकीदार चोर' मोहिम चांगलीच हिट झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी