शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसने मान्य केलं 'चौकीदार चोर'चा नारा फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 17:05 IST

भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजयाची नोंद करताना २०१४ मधील स्वत:ची कामगिरी आणखी उंचावली आहे. यात काँग्रेसची वाताहत झाल्याचे चित्र आहे. भाजप प्रणीत एनडीएने बहुमताकडे आगेकूच केली आहे. तर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे.

भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली. काँग्रेसला केवळ ५५ जागा मिळाल्या. सध्या काँग्रेसच्या मुख्यालयात शांतता पसरली आहे. आधीच एक्झिट पोलने आधीच एनडीएला बहुमत दाखवले होते.

सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देण्यात आलेला 'चौकीदार चोर'चा नारा सपशेल फसल्याचे काँग्रेसकडून मान्य करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसला एवढ्या दारुण पराभवाची कल्पना नव्हती. पक्षाने एकत्र होऊन लढणे आवश्यक होते. तर काँग्रेसला मजबूत स्थितीत आणता आले असते, असंही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

राफेलच्या मुद्दावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले होते. तसेच 'चौकीदार चोर है'चा नारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने 'मै भी चौकीदार'ची मोहिम उभारली होती. मात्र 'चौकीदार चोर'ची काँग्रेसची मोहिम फसली आणि मोदींची 'मै भी चौकीदार चोर' मोहिम चांगलीच हिट झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी