शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अरुणाचल प्रदेशात मतदानापूर्वीच भाजपचा तीन जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:13 IST

अरुणाचल प्रदेशात ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच तीन जागा मिळवत आपल्या लोकसभा निवडणुकीच्या अभियानाला सुरुवात केली आहे. गुरुवारी भाजपने येथे झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने दिरांग, यचूली आणि आलो ईस्ट मतदार संघाचे निकाल घोषीत केले आहे.

अप्पर मुख्य निवडणूक आयुक्त केंगी दरांग यांनी सांगितले की, आलो ईस्ट विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे केंटी जिनी यांनी बिनविरोध निवडणूक लढवली. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मिनकिर लोलेन यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, मंगळवारी तपाणीनंतर त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहे. तसेच दिरांग मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार शेरिंग ग्युरमे आणि अपक्ष उमेदवार गोम्बू शेरिंग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यानंतर भाजपचे फुरपा शेरिंग यांना विजयी घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त यचुली विधानसभा मतदार संघातून ताबा तेदीर यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.

आता राज्यातील ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या ६० आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाBJPभाजपाArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश