शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : भाजपनेते गिरीराज सिंह बेगुसरायमधून माघारीच्या तयारीत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:19 IST

गिरीराज सिंह नवादा मतदार संघातून खासदार आहेत. परंतु एनडीएच्या जागा वाटपात नवादा मतदार संघ 'एलजेपी'कडे गेला आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आपला मतदार संघ बदलल्यामुळे नाराज आहेत. तसेच त्यांनी बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे समजते. गिरीराज यांनी त्यांचा नवादा मतदार संघ बदलण्यासाठी बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना जबाबदार धरले आहे.

बेगुसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून गिरीराज सिंह यांची समजूत काढण्यात येत आहे. गिरीराज सिंह नवादा मतदार संघातून खासदार आहेत. परंतु एनडीएच्या जागा वाटपात नवादा मतदार संघ 'एलजेपी'कडे गेला आहे. त्यामुळे भाजपकडून गिरीराज सिंह यांना बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. मात्र मतदार संघ बदलल्यामुळे गिरीराज सिंह नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी आपण नवादा मतदार संघातूनच निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. ज्या उमेदवारांचे तिकीट निश्चित झाले, त्या उमेदवारांनी लगेच आपला मतदारसंघ गाठला आहे. मात्र भाजपनेते गिरीराज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अद्याप दिल्लीत असून उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

बेगुसराय मतदार संघातून सीपाआयने जेएनयू नेता कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने तन्वीर हसन यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. परंतु बेगुसरायमधून कन्हैया कुमार यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास गिरीराज सिंह तयार नाहीत, त्यामुळे यावर भाजप काय पर्याय काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रविवारी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कन्हैया कुमारने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपली मुख्य लढाई भाजप नेते गिरीराज सिंह यांच्याविरुद्ध असून 'आरजेडी'शी नसल्याचे कन्हैया कुमार यांनी सांगितले. गिरीराज सिंह यांनीच कन्हैया कुमार देशद्रोही असल्याचे अरोप केले होते. आता दोघे लोकसभा निवडणुकीत एकमेकांना आव्हान देणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये काट्याची टक्कर होणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिहारमध्ये ४० लोकसभा मतदार संघ असून ७ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkanhaiya kumarकन्हैय्या कुमारBJPभाजपा