शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिहारमध्ये ठरलं : काँग्रेस ९ तर आरजेडी लढवणार १९ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 10:49 IST

बिहारमध्ये ११ जागांसाठी अडून बसलेल्या काँग्रेसने अखेर ९ जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दर्शविली आहे. तसेच आपल्या दोन जागा काँग्रेस सीपीआयएमला देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाटना - बिहारमध्ये अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होताना दिसत आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर बिहारमधील ४० लोकसभा जागांसाठी महायुतीचा निर्णय झाल्याचे म्हटले आहे. याआधी उभय पक्षांमध्ये जागा वाटपावरून बोलणी फिसकटल्याचे वृत्त आले होते.

बिहारमध्ये आरजेडी १९ आणि काँग्रेस ९ जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरित जागांवर महायुतीतील आरएलएसपी या सारखे छोटे पक्ष निवडणूक लढविणार आहे. दरम्यान या जागावाटपात अद्याप भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सामील करण्यात आलेले नाही. सीपीआयएम बेगूसरायमधून कन्हैया कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा महायुतीकडून कन्हैया यांच्यासाठी सोडण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये ११ जागांसाठी अडून बसलेल्या काँग्रेसने अखेर ९ जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दर्शविली आहे. काँग्रेसने ज्या दोन जागा सोडल्या आहेत, त्या सीपीआयएमला देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला (राष्ट्रीय लोक समता पक्ष) ४, जीतन मांझी यांच्या हिंदूस्थान आवाम मोर्चाला (एस) २, शरद यादव यांच्या एलजेडीला २ आणि मुकेश सहानी यांच्या व्हीआयपीला १ जागा देण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस