शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:43 IST

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतकाँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातील युतीसंदर्भात अजुनही काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढाई राजधानी दिल्लीत अपक्षीत होती. मात्र आता या लढाईत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने एंट्री करण्याचं निश्चित केले आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील माजी बसपा प्रमुख सी.पी. सिंह यांनी बसपा दिल्लीतील सातही जागा लढणार असल्याचे सांगितले.

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बसपाकडून १९८९ पासून दिल्लीत निवडणूक लढविण्यात येत आहे. दिल्लीत आपचा उद्य होण्यापूर्वी बसपाची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. मात्र त्यांना एकही लोकसभा मतदार संघात विजय मिळवता आलेला नाही. मात्र २००८ मध्ये दोन विधानसभा मतदार संघात बसपाचे उमेदवार निवडून आले होते. तर सहा जागांवर १४.५ टक्के मतदान मिळवले होते.

दरम्यान काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा आहेत. काँग्रेसला दिल्लीत तीन जागा हव्या आहेत. मात्र अद्याप यावर काहीही निर्णय झाला नाही. अनेकदा काँग्रेस-आप युतीची चर्चा फिसकटल्याचे वृत्त आले होते. त्याचवेळी युती होणार अशाही बातम्या प्रसिद्ध होतात. त्यात आता बसपाने उडी घेतल्यामुळे दिल्लीतील निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे. दिल्लीत १.४ कोटी मतदार आहेत. यामध्ये १५ टक्के दलित असून बसपाचं या मतदारांवर लक्ष आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीdelhiदिल्लीAAPआपcongressकाँग्रेसDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019