शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:43 IST

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतकाँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातील युतीसंदर्भात अजुनही काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढाई राजधानी दिल्लीत अपक्षीत होती. मात्र आता या लढाईत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने एंट्री करण्याचं निश्चित केले आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील माजी बसपा प्रमुख सी.पी. सिंह यांनी बसपा दिल्लीतील सातही जागा लढणार असल्याचे सांगितले.

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बसपाकडून १९८९ पासून दिल्लीत निवडणूक लढविण्यात येत आहे. दिल्लीत आपचा उद्य होण्यापूर्वी बसपाची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. मात्र त्यांना एकही लोकसभा मतदार संघात विजय मिळवता आलेला नाही. मात्र २००८ मध्ये दोन विधानसभा मतदार संघात बसपाचे उमेदवार निवडून आले होते. तर सहा जागांवर १४.५ टक्के मतदान मिळवले होते.

दरम्यान काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा आहेत. काँग्रेसला दिल्लीत तीन जागा हव्या आहेत. मात्र अद्याप यावर काहीही निर्णय झाला नाही. अनेकदा काँग्रेस-आप युतीची चर्चा फिसकटल्याचे वृत्त आले होते. त्याचवेळी युती होणार अशाही बातम्या प्रसिद्ध होतात. त्यात आता बसपाने उडी घेतल्यामुळे दिल्लीतील निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे. दिल्लीत १.४ कोटी मतदार आहेत. यामध्ये १५ टक्के दलित असून बसपाचं या मतदारांवर लक्ष आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीdelhiदिल्लीAAPआपcongressकाँग्रेसDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019