शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधींवरील मोदींच्या आरोपांवर अमिताभ बच्चन यांनी बोलावे : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 10:31 IST

मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरून आयोजित सभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर वैयक्तीक टॅक्सप्रमाणे केला होता, असा आरोप केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले असून राजीव गांधी यांचे त्यावेळचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सत्य समोर आणावे असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राजीव गांधी यांच्यासोबत त्यावेळी अमिताभ बच्चन देखील उपस्थित होते. त्यावेळी अमिताभ आणि राजीव यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी यासंदर्भात ट्विट करून अमिताभ बच्चन यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

अमिताभ बच्चन यांना असं वाटत नाही का, सत्य समोर आणावे ? अशा समयी त्यांना बोलण्याची गरज वाटत नाही का ? असे प्रश्न दिव्या स्पंदना यांनी ट्विटरवरून उपस्थित केले.

 

दिव्या स्पंदना यांनी एक ट्विट अमिताभ यांच्यासह अभिनेता अक्षय कुमारला देखील टॅग केले आहे. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmitabh Bachchanअमिताभ बच्चनcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपा