शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

राजीव गांधींवरील मोदींच्या आरोपांवर अमिताभ बच्चन यांनी बोलावे : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 10:31 IST

मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरून आयोजित सभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर वैयक्तीक टॅक्सप्रमाणे केला होता, असा आरोप केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले असून राजीव गांधी यांचे त्यावेळचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सत्य समोर आणावे असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राजीव गांधी यांच्यासोबत त्यावेळी अमिताभ बच्चन देखील उपस्थित होते. त्यावेळी अमिताभ आणि राजीव यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी यासंदर्भात ट्विट करून अमिताभ बच्चन यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

अमिताभ बच्चन यांना असं वाटत नाही का, सत्य समोर आणावे ? अशा समयी त्यांना बोलण्याची गरज वाटत नाही का ? असे प्रश्न दिव्या स्पंदना यांनी ट्विटरवरून उपस्थित केले.

 

दिव्या स्पंदना यांनी एक ट्विट अमिताभ यांच्यासह अभिनेता अक्षय कुमारला देखील टॅग केले आहे. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmitabh Bachchanअमिताभ बच्चनcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपा