शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

साक्षी महाराज नरमले; म्हणाले, पक्षाला इशारा नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:34 IST

नुकतेच भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी तिकीट कापण्याच्या भीतीने पक्षाला एकप्रकारे इशारा दिला. मात्र, याबाबत आता त्यांनी यू टर्न घेतला आहे.

ठळक मुद्देउमेदवारांनी आपले तिकीट कापले जाण्याच्या भीतीने पक्षाला अल्टीमेटम द्यायला सुरुवात केली आहे. 'मी पक्षासोबत आहे आणि यापुढेही राहणार. मला उन्नावमधून तिकीट मिळणार आहे, याची कल्पना आहे.'आपल्या बेताल वक्तव्यामुळे साक्षी महाराज नेहमीच चर्चेत असतात.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. तर, काही उमेदवारांनी आपले तिकीट कापले जाण्याच्या भीतीने पक्षाला अल्टीमेटम द्यायला सुरुवात केली आहे. 

नुकतेच भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी तिकीट कापण्याच्या भीतीने पक्षाला एकप्रकारे इशारा दिला. मात्र, याबाबत आता त्यांनी यूटर्न घेतला आहे. साक्षी महाराज म्हणाले, 'मी पक्षासोबत आहे आणि यापुढेही राहणार. मला उन्नावमधून तिकीट मिळणार आहे, याची कल्पना आहे. मला तिकीट भेटले नाही, तरी मी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार आहे.' 

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाकडून अनेक विद्यमान खासदारांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये साक्षी महाराज यांचेदेखील नाव असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर साक्षी महाराज यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांना पत्र लिहिले की, मी उन्नावमध्ये येण्यापूर्वी जिल्ह्यात मागील दहा वर्षांत भाजपाचा एकही विधानसभा सदस्य नव्हता. परंतु, आज भाजपाचे सहा आमदार आणि एक विधान परिषद सदस्य आहे. पक्षाने आपल्याविरुद्ध काही निर्णय घेतल्यास, याचा देश आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम होईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगला नसेल, असे साक्षी महाराज यांनी म्हटले होते.

दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यामुळे साक्षी महाराज नेहमीच चर्चेत असतात. तसेच भाजपाकडून एखाद्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि त्याचे समर्थन करणारे म्हणूनही साक्षी महाराज यांची ओळख आहे.

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा