शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

लॉकडाऊनमुळे शंभर लाख टन साखर राहणार शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 05:47 IST

‘कोविड-१९’ चा परिणाम : सलग तिसऱ्या हंगामात मोठ्या प्रमाणावर साखर राहणार शिल्लक

विशाल शिर्के

पुणे : लॉकडाऊनमुळे साखरेच्या मागणीत झालेली घट, निर्यातीवर आलेली मर्यादा यामुळे यंदा मार्चअखेरीस देशात तब्बल २२० लाख टन साखर शिल्लक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीतपेय आणि आइस्क्रीम न खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असल्याने मागणीत आणखी घट झाली आहे. त्यामुळे यंदा देशांतर्गत उत्पादन कमी होऊनही सलग तिसºया हंगामात

साखर उद्योगाला शिल्लक साखरेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील हंगाम सुरू होताना किमान शंभर लाख टन साखर शिल्लक राहील,असा अंदाज साखर क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. देशामध्ये मार्चअखेरीस २३२.७४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा महाराष्ट्र, कर्नाटकामधे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने या दोन्ही राज्यांत साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे देशातील साखरउत्पादन २६५ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे. या पूर्वीच्या दोन गाळप हंगामांत प्रत्येकी ३३० ते ३३३ लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले होते. चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी तब्बल १४५ लाख टन साखर देशात शिल्लक होती. त्यामुळे यंदा ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अधिकाधिक साखर निर्यात करून शिल्लकी साखरेचा साठा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.कोरोनाने देशासह जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद आहेत. तसेच, दक्षता म्हणून शीतपेय आणि आइस्क्रिम खाण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. परिणामी, देशांतर्गत खपही घटला आहे.मार्च महिन्यात केंद्र सरकारने २१ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला होता. मागणी नसल्याने त्यास १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी साखर उद्योगाने केंद्र सरकारकडे केली होती. तसेच, एप्रिल महिन्याचा कोटा १८ लाख टन करण्यास केंद्र सरकारने मान्यतादिली आहे.देशातील साखर स्थिती (२०१९-२० हंगाम, आकडे लाख टनामध्ये)१ आॅक्टोबर २०१९ शिल्लक साखर १४५.७९मार्च २०२० अखेरची शिल्लक साखर २३२.७४एकूण उपलब्ध साखर ३७८देशांतर्गत खप १३०.१२निर्यात २८निर्यात-देशांतर्ग खप वजा शिल्लक २२०.४१देशाचा साखरेचा वार्षिक खप २६० लाख टन इतका आहे. लग्नसराई आणि उन्हाळ्यात शीतपेय आणि इतर गोष्टींना असलेली मागणी यामुळे ‘मार्च ते मे’ या कालावधीत मासिक सुमारे १ लाख टनांनी मागणी वाढते. कोरोनामुळे व्यवहार ठप्प असल्याने देशांतर्गत मागणीत यंदा घट होईल. युरोपियन देशातही कोरोनाने धुमाकूळ घातला असल्याने निर्यातीवर देखील विपरीत परिणाम होईल. किमान १०० लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे.-अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन, पुणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSugar factoryसाखर कारखाने