शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 7:02 PM

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते

मुंबई -कोरोना लॉकडाऊन काळात सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे. अगदी गावच्या सरपंचापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच या प्लॅटफॉर्मचा वापर करुन संपर्क अभियान सुरु ठेवलं. घरातून बाहेर पडता येत नसल्याने, फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहितीचं आदान प्रदान आणि संवाद साधण्यात आला आहे. याच काळात, बांग्लादेशातील एका युवकाची पंजाबमधील तरुणीशी मैत्री झाली. त्यातून, तिच्या प्रेमासाठी तो चक्क २ हजार किमी पायपीट करुन पंजाबपर्यंत पोहोचला. 

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते. प्रेमात वेडा झालेला हा तरुण कोलकातामार्गे भारतीय सीमा ओलांडून आला, पण अटारी बॉर्डर येथे अडकला. येथून पाकिस्तानला जाण्याच्या प्रयत्नात असताना, बीएसएफच्या जवानांनी घुसखोर म्हणून त्याला अटक केली. या तरुणाचा नाव नयन उर्फ अब्दुल्लाह असून तो बांग्लादेशच्या शरीयतपूरचा रहिवाशी आहे. या तरुणाकडे सखोल चौकशी केल्यानंतर प्रेमाचं सत्य समोर आलं.  

लाहौरमधील रुबिनानामक युवतीसोबत नयनची फेसबुकद्वारे मैत्री झाली. त्यानंतर, दोघेही रात्रभर एकमेकांशी बोलत, त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हळू हळू गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. त्यामुळे रुबीनाने त्याला पाकिस्तानला बोलावून घेतले. मात्र, आपल्या घरापासून पाकिस्तान बराच दूर आहे, त्यामुळे भेट अशक्य वाटत होती. मात्र, पाकिस्तानमध्ये आल्यास आपण लग्न करू असं वचन रुबीनाने दिले होते. त्यामुळे, जोखीम पत्करत नयने बांग्लादेशची सीमा पार करत, भारतीय हद्दीत प्रवेश केला. कोलकाता येथून दिल्ली गाठली. दिल्लीतून अमृतसरपर्यंत पायीच प्रवास केला. रुबीनाच्या भेटीच्या ओढीत दिवस-रात्र चालत होता. कधी उपाशीपोटीच तो झोपतही होता. मात्र, लॉकडाऊन असल्याने लोकांनी वाटेत मदत केली. जेवणाचं साहित्यही भेटत गेलं. अमृतसर पोहोचल्यानंतर भेटीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 

अमृतसर येथून केवळ २७ किमी दूरवरील लाहौर येथे रुबीना होती. मात्र, अमृतसरच्या सीमारेषेवर सगळीकडे सैन्य तैनात केलेले होते. फेसिंगमुळे त्याला सीमारेषेवरुन जाताना अडचण निर्माण होत होती. त्याचदरम्यान, सीमारेषेवरील जवानांनी संशयास्पद असल्याने या युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर, येथील काहन गढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. पोलिसांना त्याच्याकडे कुठलिही संशयास्पद वस्तू नाही मिळाली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFacebookफेसबुकBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान