शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:31 IST

अत्यावश्यक सेवांची वाहनेच रस्त्यावर; देशभरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचा परिणाम

- भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांनाही ब्रेक लागला आहे. अत्यावश्यक सेवांचा परवाना दिलेली वाहनेच रस्त्यावर धावत असून त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. महानगरांमध्येही शुकशुकाट असल्याने रस्ते अपघातांची किरकोळ नोंद झाली आहे.जसे लॉकडाऊन जाहीर झाले आहे तसे देशात रस्ते अपघातांचे प्रमाण नगण्य झाले आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. रस्ते सामसूम असल्याने या वाहनांच्या रहदारीला कुठलाही अडथळा नाही. त्यामुळेच रस्ते अपघात होत नसल्याचे दिसून येत आहे. देशात एकूण ७३६ जिल्हे आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या मोठ्या महानगरांमध्ये जिथे वाहतूक कोंडी होते तिथे आता रस्त्यावर चिटपाखरूही नसल्याचे दिसून येत आहे.देशात सर्वाधिक रस्ते अपघात हे राजधानी दिल्लीत होतात. सरासरी पाच जणांचा दिल्लीत बळी जातो, अशी सरकारी नोंद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने हे प्रकार प्रामुख्याने घडतात, असे दिल्ली वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.१५ ते ३१ मार्चदरम्यान दिल्लीत केवळ १९ रस्ते अपघातांची नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४८ एवढी होती. राजधानीत गेल्या २० दिवसांतही तुरळक अपघात झाले आहेत. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. असेच चित्र अन्य महानगरांमध्येही आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्या काही अत्यल्प अपघातांची नोंद आहे त्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुरांचा वाहन धडकल्याने बळी गेला आहे.कोणत्या वर्षी किती अपघात?2017 मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात ४ लाख ६४ हजार ९१० तर २०१८ मध्ये ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले.2018 मध्ये रस्ते अपघातात १ लाख ५१ हजार ४७१ जणांचा बळी गेला. देशभरातील रस्त्यांमध्ये १.९४ टक्के हे राष्ट्रीय महामार्ग तर २.९७ टक्के हे राज्य महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वसाधारणपणे ३० टक्के अपघात होतात, तर मृतांचे प्रमाण ३५.७ टक्के एवढे आहे, तर राज्य महामार्गावर हीच स्थिती २५.२ टक्के अपघात आणि २६.८ टक्के मृत्यूदर एवढी आहे.95.1 टक्के रस्त्यांवर तब्बल ४५ टक्के अपघात होतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळता तेथील मृतांची संख्याही ३८ टक्के आहे. मृतांमध्ये १५ टक्के हे पादचारी असतात. २.४ टक्के हे सायकलस्वार, तर ३६.५ टक्के दुचाकीस्वार असतात. १८ ते ४५ वय असलेले ६९.६ टक्के जण हे रस्ते अपघातात ठार होतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात