शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:31 IST

अत्यावश्यक सेवांची वाहनेच रस्त्यावर; देशभरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचा परिणाम

- भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांनाही ब्रेक लागला आहे. अत्यावश्यक सेवांचा परवाना दिलेली वाहनेच रस्त्यावर धावत असून त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. महानगरांमध्येही शुकशुकाट असल्याने रस्ते अपघातांची किरकोळ नोंद झाली आहे.जसे लॉकडाऊन जाहीर झाले आहे तसे देशात रस्ते अपघातांचे प्रमाण नगण्य झाले आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. रस्ते सामसूम असल्याने या वाहनांच्या रहदारीला कुठलाही अडथळा नाही. त्यामुळेच रस्ते अपघात होत नसल्याचे दिसून येत आहे. देशात एकूण ७३६ जिल्हे आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या मोठ्या महानगरांमध्ये जिथे वाहतूक कोंडी होते तिथे आता रस्त्यावर चिटपाखरूही नसल्याचे दिसून येत आहे.देशात सर्वाधिक रस्ते अपघात हे राजधानी दिल्लीत होतात. सरासरी पाच जणांचा दिल्लीत बळी जातो, अशी सरकारी नोंद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने हे प्रकार प्रामुख्याने घडतात, असे दिल्ली वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.१५ ते ३१ मार्चदरम्यान दिल्लीत केवळ १९ रस्ते अपघातांची नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४८ एवढी होती. राजधानीत गेल्या २० दिवसांतही तुरळक अपघात झाले आहेत. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. असेच चित्र अन्य महानगरांमध्येही आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्या काही अत्यल्प अपघातांची नोंद आहे त्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुरांचा वाहन धडकल्याने बळी गेला आहे.कोणत्या वर्षी किती अपघात?2017 मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात ४ लाख ६४ हजार ९१० तर २०१८ मध्ये ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले.2018 मध्ये रस्ते अपघातात १ लाख ५१ हजार ४७१ जणांचा बळी गेला. देशभरातील रस्त्यांमध्ये १.९४ टक्के हे राष्ट्रीय महामार्ग तर २.९७ टक्के हे राज्य महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वसाधारणपणे ३० टक्के अपघात होतात, तर मृतांचे प्रमाण ३५.७ टक्के एवढे आहे, तर राज्य महामार्गावर हीच स्थिती २५.२ टक्के अपघात आणि २६.८ टक्के मृत्यूदर एवढी आहे.95.1 टक्के रस्त्यांवर तब्बल ४५ टक्के अपघात होतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळता तेथील मृतांची संख्याही ३८ टक्के आहे. मृतांमध्ये १५ टक्के हे पादचारी असतात. २.४ टक्के हे सायकलस्वार, तर ३६.५ टक्के दुचाकीस्वार असतात. १८ ते ४५ वय असलेले ६९.६ टक्के जण हे रस्ते अपघातात ठार होतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात