शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:31 IST

अत्यावश्यक सेवांची वाहनेच रस्त्यावर; देशभरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचा परिणाम

- भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांनाही ब्रेक लागला आहे. अत्यावश्यक सेवांचा परवाना दिलेली वाहनेच रस्त्यावर धावत असून त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. महानगरांमध्येही शुकशुकाट असल्याने रस्ते अपघातांची किरकोळ नोंद झाली आहे.जसे लॉकडाऊन जाहीर झाले आहे तसे देशात रस्ते अपघातांचे प्रमाण नगण्य झाले आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. रस्ते सामसूम असल्याने या वाहनांच्या रहदारीला कुठलाही अडथळा नाही. त्यामुळेच रस्ते अपघात होत नसल्याचे दिसून येत आहे. देशात एकूण ७३६ जिल्हे आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या मोठ्या महानगरांमध्ये जिथे वाहतूक कोंडी होते तिथे आता रस्त्यावर चिटपाखरूही नसल्याचे दिसून येत आहे.देशात सर्वाधिक रस्ते अपघात हे राजधानी दिल्लीत होतात. सरासरी पाच जणांचा दिल्लीत बळी जातो, अशी सरकारी नोंद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने हे प्रकार प्रामुख्याने घडतात, असे दिल्ली वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.१५ ते ३१ मार्चदरम्यान दिल्लीत केवळ १९ रस्ते अपघातांची नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४८ एवढी होती. राजधानीत गेल्या २० दिवसांतही तुरळक अपघात झाले आहेत. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. असेच चित्र अन्य महानगरांमध्येही आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्या काही अत्यल्प अपघातांची नोंद आहे त्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुरांचा वाहन धडकल्याने बळी गेला आहे.कोणत्या वर्षी किती अपघात?2017 मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात ४ लाख ६४ हजार ९१० तर २०१८ मध्ये ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले.2018 मध्ये रस्ते अपघातात १ लाख ५१ हजार ४७१ जणांचा बळी गेला. देशभरातील रस्त्यांमध्ये १.९४ टक्के हे राष्ट्रीय महामार्ग तर २.९७ टक्के हे राज्य महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वसाधारणपणे ३० टक्के अपघात होतात, तर मृतांचे प्रमाण ३५.७ टक्के एवढे आहे, तर राज्य महामार्गावर हीच स्थिती २५.२ टक्के अपघात आणि २६.८ टक्के मृत्यूदर एवढी आहे.95.1 टक्के रस्त्यांवर तब्बल ४५ टक्के अपघात होतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळता तेथील मृतांची संख्याही ३८ टक्के आहे. मृतांमध्ये १५ टक्के हे पादचारी असतात. २.४ टक्के हे सायकलस्वार, तर ३६.५ टक्के दुचाकीस्वार असतात. १८ ते ४५ वय असलेले ६९.६ टक्के जण हे रस्ते अपघातात ठार होतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात